शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तलावांना अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: November 9, 2014 22:27 IST

भंडारा गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून संपर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. या खरीप हंगामात सिंचनाकरिता पाणी दिल्याने केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे.

तुमसर : भंडारा गोंदिया जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून संपर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. या खरीप हंगामात सिंचनाकरिता पाणी दिल्याने केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे. अनेक वर्षापासून या तलावांचे खोलीकरण झाले नसून सर्वच तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती आहे. यात मामा तलाव, जिल्हा परिषद, राज्य जलसंपदा व गाव तलावांचा समावेश आहे. या जिल्ह्यात निलक्रांतीचे स्वप्न भंगण्याची शक्यता बळावली आहे.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सुमारे १४ हजार तलावांची नोंद शासनदप्तरी आहे. कागदावर तलावांचे जलक्षेत्र मोठे असून प्रत्यक्षात आराजी जलक्षेत्र कमी आहे. जवळील शेतकऱ्यांनी या तलावावर अतिक्रमण केल्याची माहिती आहे. खीप हंगामात धानपिकाला बहुतेक सर्वच तलावातून पाणी देण्यात आले होते. त्यामुळे सध्या या तलावात केवळ २५ ते ३० टक्केच जलसाठा सध्या उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती आहे.भंडारा जिल्ह्यात रावणवाडी, चांदपूर, आंबागड, बघेडा, शिवणीबांध, सिरेगावबांध, पवनी तलाव, ढिवरवाडा, कोका जंगल, डोडमाझरी, जांभोरा, पालोरा, सिल्ली, खमारी, एकोडी, बांपेवाडा, बारव्हा, पालांदूर, मुरमाडी (हमेशा) तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, कालपात्री, आमगाव, खळबंधा, पांगळी, इटियाडोह, कटंगी, भानपूर या मोठ्या तलावांचा त्यात समावेश आहे.मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील तलावाचे शासनदप्तरी जलसिंचन क्षेत्र २७ हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्षात हा तलाव केवळ सध्या सात हेक्टरचा राहिला आहे. डोंगरगाव येथील मत्स्यपालन संस्थेनी येथे शासनाकडे तशी तक्रार केली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील तलाव शेवटची घटका मोजत असून या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याकरिता खोलीकरणाची मागणी राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे संचालक संजय केवट यांनी केली असून या संपूर्ण तलावांचे क्षेत्राचे शासनदप्तरी नोंद व प्रत्यक्षात जलसिंचन क्षेत्राची चौकीशीची मागणी केली आहे.निलक्रांतीचे स्वप्न भंगणारकेंद्र शासनाने मत्स्यपालन व मत्स्यव्यवसायातून रोजगार निर्मिती करीता हरितक्रांती सारखीच नीलक्रांती ही महत्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याला यामुळे अच्छे दिनाची आश होती. परंतु येथील तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात असून या तलावात पावसाळ्याखेरीज इतर मोसमात पाणीच राहत नसल्याने मत्स्यपालन कसे होईल हा मुख्य पश्न आहे.मासेमार समाज हा मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला समाज आहे. या नीलक्रांतीमुळे त्यांची प्रगती निश्चित होण्याची हमी आहे. नीलक्रांती येण्याकरिता या दोन्ही जिल्ह्यातील तलावातील तलावांचे खोलीकरण, पाण्याचा योग्य वापर करण्याचे कडक नियम, मत्स्य व्यवसायास प्रोत्साहन व प्रशिक्षण येथे देण्याची गरज आहे. सिंचन प्रकल्प अपूर्ण असल्याने व शेतपिकाकरिता तलावातून पाणी सोडणे, पर्जन्यमान कमी होत असलयाने आता येथील शेती तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नीलक्रांती योजना यशस्वीपणे राबविण्याकरिता केंद्र सरकारची चमू भंडारा व गोंदिया जिल्ह्यात लवकरच येणार असल्याची माहिती आहे. ही चमू सद्यस्थितीत तलावांची स्थिती, जलसिंचन क्षेत्र, विस्तार, तलाव किती जुने आहे व उन्हाळ्यात या तलावात किती जलसाठा उपलब्ध राहतो याची चौकशाी करणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)