शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:21 IST

सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे हस्ते झाले.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांची माहिती : जिल्ह्यात लोकसंवाद जागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्हयामध्ये सहकारी संस्था आधारभूत धान खरेदी केंद्र चालविणे, बारदाना खरेदी विक्री, बि-बियाणे व रासायनिक खते खरेदी विक्री करणे इत्यादी व्यवसाय केले जातात. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यातून १५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था- खरेदी विक्री संस्थांची निवड करण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हयात लोकसंवाद जागृती मोहिम राबविली जात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी दिली.सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे हस्ते झाले. अटल अर्थसहाय्य समितीचे सदस्य शिवराम गिºहेंपूंजे, पुर्ती अटल संस्थेचे अध्यक्ष धनश्याम खेडीकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूरचे अध्यक्ष विजय कापसे, शेतकरी उत्पादन कंपनीचे संजय एकापूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खरेदी विक्री संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या बळकटीकरणासाठी जिल्हयात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जवळपास ३५ प्रकारचे विविध व्यवसाय संस्था निवड करु शकतील. या द्वारे संस्थांचे व सभासदांचे सक्षमीकरण व बळकटीकरण होण्यास हातभार लागणार आहे. या व्यवसायाची जनजागृती व्हावी व ते सहकारी संस्थांपर्यंत पोहचावे या उद्देशाने लोकसंवाद जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याचे देशकर यांनी सांगितले.गतवर्षी ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी असे व्यवसाय करुन त्यांचे सभासदांना पिक कर्ज, मुदत कर्ज देवून उत्तम सेवा दिली व सदर व्यवसायातून नफा कमविला अशा संस्थांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.त्यामध्ये प्रथम क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सुकळी, द्वितीय क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडद व तृतीय क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गोंडउमरी या संस्थांना राज्यस्तरावर कार्यक्रम घेऊन, त्यांना पुरस्कार व रोख रक्कम अदा करण्यात आले. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पालांदूर या संस्थेने सभासदांना दिलेल्या सेवा व सुरु केलेल्या इतर व्यवसायात नफा मिळविल्याने राज्यस्तरावर यशोगाथा प्रसिध्द करण्यात आली.अटल महापणन अभियान अंतर्गत निवड केलेल्या संस्थांनी पुढाकार घ्यावा हा या मागील मुख्य हेतू आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले. शिवराम गिºहेंपुंजे, घनश्याम खेडीकर, संजय एकापूरे व विजय कापसे यांनी मार्गदर्शन केले. योजनेनुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी विविध व्यवसाय हाती घेवून, संस्थेच्या सभासदांना सेवा पुरवावी व संस्थेचे बळकटीकरण करावे, असे विचार मांडले. आभार एच.के. हटवार यांनी मानले.संस्थांना १३ लाखांचा नफाया अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात १०५ संस्थांनी सामंजस्य करार केला असून १८ संस्थांनी प्रत्यक्ष व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात २१ लाख ६८ हजार ४०० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून ७ कोटी ४३ लाख ४३ हजार ७१० रुपयांची उलाढाल झाली आहे. या संस्थांना रक्कम रुपये १२ लाख ९० हजार ३४ निव्वळ नफा झाला.