शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:30 IST

परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.

ठळक मुद्देतोड्याचा हंगाम अंतिम टप्यात : अड्याळ परिसरात अनेक ठिकाणी मिरचीचे उत्पादन

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.रबीचे क्षेत्र घटले असल्यामुळे महिलावर्गाला ग्रामीण भागात काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे मिरची तोड्याचा हंगाम परिसरातील महिलांसाठी फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी बोलताना दिली.अड्याळ आणि परिसरातील शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे. शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील मिरची पिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पिक आहे. धानपिकातून शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही . त्यातही गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती गोसे धरणात गेली असल्याने येथील कामगारांना मजूरीशिवाय दुसरा पर्याय नाही.महिला मजुरांना दहा रुपये किलो दराप्रमाणे पैसे मिळत असल्याने दिवसाकाठी प्रत्येक महिलेला दिडशे ते दोनशे रुपये रोजगार उपलब्ध होत आहे. आणखी काही दिवस मिरची तोड्यासह रबीचा हंगाम सुरु असल्याने काही दिवस तरी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला मजूर आनंदीत आहेत.रोहयो कामाची गरजशेतकरी वर्गाला यावर्षी निसर्गाचा फटका बसल्याने खरीप पिकाचे उत्पन्न मिळाले नाही. रबीचीही पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांना सध्या उसणवार करुन व्यवहार करावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना बँकेचे पीक कर्ज सोसायट्या भरणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजुरांना दिलासा देण्याची गरज आहे.