शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:30 IST

परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.

ठळक मुद्देतोड्याचा हंगाम अंतिम टप्यात : अड्याळ परिसरात अनेक ठिकाणी मिरचीचे उत्पादन

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.रबीचे क्षेत्र घटले असल्यामुळे महिलावर्गाला ग्रामीण भागात काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे मिरची तोड्याचा हंगाम परिसरातील महिलांसाठी फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी बोलताना दिली.अड्याळ आणि परिसरातील शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे. शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील मिरची पिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पिक आहे. धानपिकातून शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही . त्यातही गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती गोसे धरणात गेली असल्याने येथील कामगारांना मजूरीशिवाय दुसरा पर्याय नाही.महिला मजुरांना दहा रुपये किलो दराप्रमाणे पैसे मिळत असल्याने दिवसाकाठी प्रत्येक महिलेला दिडशे ते दोनशे रुपये रोजगार उपलब्ध होत आहे. आणखी काही दिवस मिरची तोड्यासह रबीचा हंगाम सुरु असल्याने काही दिवस तरी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला मजूर आनंदीत आहेत.रोहयो कामाची गरजशेतकरी वर्गाला यावर्षी निसर्गाचा फटका बसल्याने खरीप पिकाचे उत्पन्न मिळाले नाही. रबीचीही पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांना सध्या उसणवार करुन व्यवहार करावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना बँकेचे पीक कर्ज सोसायट्या भरणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजुरांना दिलासा देण्याची गरज आहे.