शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:30 IST

परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.

ठळक मुद्देतोड्याचा हंगाम अंतिम टप्यात : अड्याळ परिसरात अनेक ठिकाणी मिरचीचे उत्पादन

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.रबीचे क्षेत्र घटले असल्यामुळे महिलावर्गाला ग्रामीण भागात काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे मिरची तोड्याचा हंगाम परिसरातील महिलांसाठी फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी बोलताना दिली.अड्याळ आणि परिसरातील शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे. शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील मिरची पिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पिक आहे. धानपिकातून शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही . त्यातही गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती गोसे धरणात गेली असल्याने येथील कामगारांना मजूरीशिवाय दुसरा पर्याय नाही.महिला मजुरांना दहा रुपये किलो दराप्रमाणे पैसे मिळत असल्याने दिवसाकाठी प्रत्येक महिलेला दिडशे ते दोनशे रुपये रोजगार उपलब्ध होत आहे. आणखी काही दिवस मिरची तोड्यासह रबीचा हंगाम सुरु असल्याने काही दिवस तरी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला मजूर आनंदीत आहेत.रोहयो कामाची गरजशेतकरी वर्गाला यावर्षी निसर्गाचा फटका बसल्याने खरीप पिकाचे उत्पन्न मिळाले नाही. रबीचीही पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांना सध्या उसणवार करुन व्यवहार करावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना बँकेचे पीक कर्ज सोसायट्या भरणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजुरांना दिलासा देण्याची गरज आहे.