शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

कर्मचाऱ्यांनी मतदान करावे

By admin | Updated: October 9, 2014 22:57 IST

जिल्ह्याचा, क्षेत्राचा आणि राज्याचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आयुध निर्माणी जवाहरनगर या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागातील मतदारांची टक्केवारी

जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम : जिल्हाधिकारी माधवी खोडे यांचे आवाहनभंडारा : जिल्ह्याचा, क्षेत्राचा आणि राज्याचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आयुध निर्माणी जवाहरनगर या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी आयुध निर्माणीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येत्या १५ आॅक्टोंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.आयुध निर्माणी जवाहर नगर परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी आयुध निर्माणीचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, आयुध निर्माणीचे अधिकारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाल्या, निवडणूक आयोगानेच जनतेमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पहिल्यांच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनतेने मतदान करण्याचे आवाहन येथे आहे. जवाहरनगर परिसरामधील मतदान केंद्र क्रमांक १७७ ते १८४ या केंद्रावर मतदान कमी होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या भागात मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत ही बैठक आयोजित केली आहे. आयुध निर्माणीचे कर्मचारी सुशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना आपल्या हक्काची जाणीव आहे. लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे मतदान दूत व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.भंडारा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले, मतदान करणे हा आपल्याला मिळालेला संवैधानिक अधिकारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा जिल्हा महाराष्ट्रात मतदान टक्केवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. सर्व कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)