शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

कर्मचाऱ्यांनी मतदान करावे

By admin | Updated: October 9, 2014 22:57 IST

जिल्ह्याचा, क्षेत्राचा आणि राज्याचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आयुध निर्माणी जवाहरनगर या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागातील मतदारांची टक्केवारी

जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम : जिल्हाधिकारी माधवी खोडे यांचे आवाहनभंडारा : जिल्ह्याचा, क्षेत्राचा आणि राज्याचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आयुध निर्माणी जवाहरनगर या भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी आयुध निर्माणीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येत्या १५ आॅक्टोंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.आयुध निर्माणी जवाहर नगर परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी आयुध निर्माणीचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, आयुध निर्माणीचे अधिकारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाल्या, निवडणूक आयोगानेच जनतेमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पहिल्यांच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनतेने मतदान करण्याचे आवाहन येथे आहे. जवाहरनगर परिसरामधील मतदान केंद्र क्रमांक १७७ ते १८४ या केंद्रावर मतदान कमी होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या भागात मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आयुध निर्माणीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत ही बैठक आयोजित केली आहे. आयुध निर्माणीचे कर्मचारी सुशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना आपल्या हक्काची जाणीव आहे. लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे मतदान दूत व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.भंडारा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले, मतदान करणे हा आपल्याला मिळालेला संवैधानिक अधिकारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा जिल्हा महाराष्ट्रात मतदान टक्केवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. सर्व कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)