शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला कर्मचाऱ्यांचा ठेंगा

By admin | Updated: November 22, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. त्यात शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणखीनच त्रस्त झाले आहे.

अप-डाऊनमुळे काम प्रभावित : अनेक अधिकारी मुख्यालयी गैरहजरभंडारा : जिल्ह्यातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. त्यात शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणखीनच त्रस्त झाले आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे कामकाज दिवसेंदिवस रेंगाळत असतात. नागरिकांना एकाच कामासाठी शासकीय कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजवावे लागते. मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. शासकीय कार्यालये अधिकाऱ्यांच्या अप डाउनच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यात पंचायत समिती कार्यालय, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, आयुर्वेदिक दवाखाने, पशु दवाखाने, बांधकाम विभागाचे कार्यालय, वनविभागाचे कार्यालय, वीज वितरण कंपनी कार्यालय, तलाठी कार्यालये, ग्रामसेवक आहेत. ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी आरोग्य कर्मचारी केंद्रप्रमुख आदी कर्मच्याऱ्यांसह अधिकारी असे जवळपास सहा-सात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून कर्तव्य पार पाडावे, असे शासनाचे आदेश आहे. यानुरूप कर्मचारी अधिकाऱ्यांना घरभाडे दिला जातो. मात्र शासनाच्या निकष व आदेशाला ठेंगा दाखवून जिल्ह्यात अनेक कार्यरत अधिकारी, कर्मचारी अप-डाऊन करतात. जिल्ह्याती कार्यालय जवळपास ११ वाजताऐवजी दुपारी १२ ते १ वाजताच सुरू होतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ सकाळी १०.३० वाजता कार्यालय सुरू करून बसला राहतो. इतर कर्मचारी १२ वाजता येतात आणि ३ वाजता निघून जातात. हीच परीस्थिती ग्रामपंचायत कार्यालय व शाळांचीही आहे. शाळामध्ये अंतर्गत अँडजेस्टमेंट करूनही गैरहजेरी असते. कृषी आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी नेहमी दौऱ्यावर असल्याचे सांगतात. यामुळे अनेकाांंना विविध शासकिय कार्यालयीन कामकाजाकरिता त्रास सहन करावा लागतो. (नगर प्रतिनिधी)