शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वीज ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांनी सजग राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:19 IST

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतीउपयोगी उत्पादनासाठी विद्युतची अत्यंत आवश्यकता आहे.

चंद्रप्रकाश दुरूगकर यांचे प्रतिपादन : वीज वितरण तक्रार निवारण मेळावालोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतीउपयोगी उत्पादनासाठी विद्युतची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकऱ्याच्या वीज तक्रारीचे तात्काळ निराकरण करणे आज गरजेचे आहे. याकरिता वीज ग्राहकांप्रती कर्मचाऱ्यांनी सजग राहून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी केले.भंडारा वीज वितरण तक्रार निवारण मेळावा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप येथील तंटामुक्त सभागृहात आयोजित मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात जि.प. सदस्य दुरूगकर बोलत होते. यावेळी सरपंच कल्पना निमकर, कोंढी ग्रामपंचायत सरपंच माया वासनिक, परसोडी ग्रामपंचायत सरपंच पंकज सुखदेवे, पंचायत समिती सदस्य अनिल वसानी, उपअभियंता प्रदीप भोयर, शाखा अभियंता महेश कोडवते, सहायक लेखापाल राजेश जागळे, ग्रामपंचायत सदस्य सिताराम बावणगडे, राहुल साखरे, जिवनलाल पुसाम, अरुणा सुहास, निर्मला जगनाडे, कुंदलता उके, प्रतिभा गिरी, मीना कांबळे, चिखली ग्रामपंचायतचे सदस्य बाळा वाघमारे, सेवानिवृत्त विज कर्मचारी नत्थु गाडीगोणे, ग्रामपंचायत कोंढीचे सदस्य विनोद दुरूगकर, उरकुडा गोंडाणे, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, ग्रामसेवक बिसेन, विज ग्राहक उपस्थित होते. उपअभियंता प्रदीप भोयर, म्हणाले कर्मचारी कमतता, साहित्यांची अत्यल्प पुरवठा यामुळे विशेष शेतकरी व वीज ग्राहकांना अडचण निर्माण होत आहे. यावर आम्हाला खेद आहे. खासदार विज कर्मचारी विज ग्राहकांचे समस्याचे तात्काळ निरकर करतील असे आश्वासन याप्रसंगी दिले. याप्रसंगी थ्री फेज विज ग्राहक संजय लांजेवार यांनी त्यांच्या परिसरात कमी दाब वीज पुरवठा व अर्थिंग मिळत नसल्याचे सांगितले. मिटर प्रवाह बंद असताना मिटर रिडींग सुरू असतो. चिखलीचे बाळा वाघमारे यांनी शेतावरील विद्युत पुरवठा रात्री बारानंतर सुरू होतो. पावसाळ्यात शेतकरी शेतावर कसे जाणार, वीज खंडीत झाल्यास कर्मचारी येत नाही. शेतीला पाणीपुरवठा कसा करावा, विक्री गिरीपुंजे यांचे शेताची लाईन दीड वर्षानंतर सुरू झाली. आज रात्रीला वीज पुरवठा होते. मध्येख तीन दिवस पुरवठा खंडीत झाला. लाईनमन गावात राहत नाही. शेतकरी केव्हा सुखावणार असा प्रश्न केला. दौलत मथुरे यांनी तक्रार केली की, सदर वीज कर्मचारी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करीत असतात. यावर सभाअध्यक्ष करवी सर्व समस्याचे करण्याचे आश्वासन उपअभियंता व शाखा अभियंता यांनी दिले. याप्रसंगी विद्युत बिल आणि विजेमुळे होणाऱ्या तक्रारी ठाणा परसोडी कोंढी येथील सरपंचानी मांडले, तक्रारी संबंधी सरपंच कल्पना निमकर यांनी निवेदन दिले. संचालन राजेश जांगळे यांनी केले. आभार महेश कोडवते यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रमोद किरणापुरे, प्रेमचंद वंजारी, जितेंद्र कुलरकर, विमलकुमार वैद्य, पुरूषोत्तम चांदपुरकर, संजय मेश्राम यांनी सहकार्य केले.