शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

तंटामुक्त मोहिमेत महिला सुरक्षेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील ...

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात येत आहेत. त्यामुळे आता शासनाने ग्रामीण भागातील स्त्री अत्याचाराच्या घटनेचा चढता आलेख पाहता त्यावर तात्काळ आळा घालण्यासाठी तंटामुक्त गाव मोहिमेचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत महिला सुरक्षा व महिलांसंबंधी असलेल्या प्रकरणात अधिक दक्ष राहण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महिलांसंबंधी आलेल्या सर्व प्रकरणात मार्गदर्शन व त्यासंबंधी परिणामकारक अंमलबजावणी होण्यासंबंधी राज्यातील सर्व तंटामुक्त गाव समित्यांना गृह विभागाच्या वतीने सूचित केले आहे. मोहिमेच्या दहा वर्षात गाव समित्यांनी गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संबंधित गावातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले असून, न्यायव्यवस्थेवरचा ताणही कमी होण्यास मदत झाली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात राज्यातील हजारो गावांनी तंटामुक्त होत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे पटकाविली आहेत. त्यातून गाव विकासाला चालना मिळाली आहे.

आता महिलांना तंटामुक्त गाव समितीत ५० टक्के इतका समान वाटा अनिवार्य करण्यात आल्याने, महिलांविषयक समस्या झपाट्याने सुटण्यास मदत होणार आहे. मात्र अद्यापही काही गावांमध्ये महिला सदस्यांना कागदोपत्री सामावून घेत प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे.