शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१०८६ सेवाविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:13 IST

शासकीय सेवेत अख्खे आयुष्य सेवा करून जर स्वत:च्या समस्या निकाली काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांचा शासकीय कामावर परिणाम होऊन प्रशासकीय कामाची गती मंदावत असते.

ठळक मुद्देउपक्रमाचे कौतुक : मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय सेवेत अख्खे आयुष्य सेवा करून जर स्वत:च्या समस्या निकाली काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांचा शासकीय कामावर परिणाम होऊन प्रशासकीय कामाची गती मंदावत असते. सामान्य माणसाला एखाद्या विभागाकडून स्वत:ची समस्या निकाली निघण्याची अपेक्षा असते, त्याच प्रमाणे अधिकारी, कर्मचारीही अपेक्षा बाळगून असतात. जर ती समस्या एखाद्या अधिकाºयांच्या नजरेतून गेली आणि त्यावर उपायाची फूंकर लागली तर प्रशासनाचा कारभार गतीने चालेल यात शंका नाही.भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी जिल्हा परिषद मधील विभागांना स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच अधिकारी, कर्मचारी यांच्या अंतर्गत समस्यांचा अभ्यास केला. अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या निकाली निघाल्याशिवाय प्रशासनाची गाडी तेज गतीने पळणार नाही या निष्कर्षाप्रत पोहचून कालबद्ध वेळेत सेवाविषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. सामान्य प्रशासनाच्या कार्यकुशलतेने व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबरपर्यंत १०८६ प्रकरणे निकालात काढून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशासनातील कार्य गतीने करण्यासाठी मनोबल वाढविले आहे.एखाद्या अभियानाच्या काळात आणि कालबद्ध वेळेत ऐवढे प्रकरणे निकाली काढण्याचा हा पहिलाच इतिहास आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशासकीय कामकाज कार्य कुशलतेचा परिचय देणारे ठरले आहे.देशभर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे मार्गदर्शनात संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हे अभियान राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी करून स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. शपथ घेण्यापासून तर वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छता करण्यापर्यंत विविध उपक्र्रमाची अंमलबजाणी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने यात पुढाकार घेवून जिल्हा परिषद स्तरावर विविध विभागांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या आवाहनाला साद प्रतिसाद देत कर्मचाºयांनी स्वत:चे टेबलापासून तर स्टोअर रूपपर्यंत कार्यालय झाडून काढली.सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी ते टास्क चॅलेज म्हणून स्विकारत स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या काळातच अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्या प्रकरणांची पडताळणी करून स्वच्छता ही सेवा अभियानाच्या काळात २५ सप्टेंबरपर्यंत तब्बल १०८६ प्रकरणे निकाली काढली काढण्यात आली आहेत. प्रकरणाची संख्या ४१० पहिला, दुसरा लाभ मंजूर झालेले प्रकरणाची संख्या २०२, परिविक्षाधीन समाप्ती मंजूर झालेले प्रकरणाची संखया ५२, संगणक परिक्षा पास होण्यापासून सुट प्रकरणाची संख्या ७३, सेवाप्रवोशोत्तर परीक्षा पासून सुट प्रकरणाची संख्या १३, मराठी, हिंदी परिक्षापासून सुट प्रकरणाची संख्या ३२७, वैद्यकीय देयके मंजुर झालेल्या प्रकरणाची संख्या ९ असे १०८६ सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्याचे कार्य सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभाग प्रमुखांच्या सहायाने वेळेत पूर्ण केले आहे.