शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

रिडिंग न घेताच पाठविले जातात विजेची देयके

By admin | Updated: November 20, 2014 22:46 IST

महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना विद्युत बिलात ५० टक्के सुट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी महावितरणने नवीनच फंडा सुरू केला आहे.

लाखनी : महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना विद्युत बिलात ५० टक्के सुट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी महावितरणने नवीनच फंडा सुरू केला आहे. रिडींग न घेताच विद्युत बिल पाठविले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किती युनिट वीज वापरली व त्याचे बिल किती आले, हे कळत नाही. नंतरच्या बिलात मात्र भरपूर युनिट जळाल्याचे दाखवून शेतकऱ्यांकडून अधिकचे बिल वसूल केले जात आहे.लखनी तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या मिटरची रिडींग न घेताच बिल पाठविण्यात आले आहे. लागोपाठ दोन बिल भरल्यानंतर तिसऱ्या बिलात शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ५० टक्के मिळणाऱ्या सुटीपासून वंचित ठेवले जात आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याच्या इशारा दिला आहे.लाखनी येथील शेतकरी महादेव रामजी गिऱ्हेपुंजे यांचे शेतात मीटर क्रमांक एजीपी १५४१, ग्राहक क्रमांक ४४५५९०७७०२३१ विद्युत मिटर लावले असून पंपाद्वारे शेतातील पिकांना पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी योजना २०१४ वाणिज्य परिपत्रक क्रमांक २२३ नुसार यापूर्वीची दोन बिले, दिलेल्या मुदतीच्या आत भरणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबर २०१४ च्या बिलामध्ये ५० टक्के सुट देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार गिऱ्हेपुंजे यांनी सदर दोन बिल अविलंब भरले. परंतु महावितरणणे त्यांना ५० टक्के सुटीचे बिल देताना बिलात आरएनए रिडींग नाट अव्हेलेबल दाखवून १७५५ युनिटचेच बिल देवून फक्त ४१० रूपयाचीच सवलत दिली. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०१३ मध्ये ३७८५, मार्च २०१४ मध्ये ३५५७ युनिट व जून २०१४ मध्ये ३१३४ युनिटचे बिल भरले आहे. परंतु सप्टेंबर २०१४ च्या बिलामध्ये रिडींग उपलब्ध नाही. आरएनए असे दाखवून फक्त १७५५ युनिटचे बिल दिले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार या बिलात १९३३ युनिट कमी दाखवून, कृषी संजीवनी योनजेच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवून आर्थिक भुर्दंड बसविला आहे. यावरून शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळू द्यायचा नाही, असे महावितरणचे धोरण असल्याचे दिसून येते. एखादे मीटर नादुरूस्त असल्यास महावितरणद्वारे जळालेल्या युनिटपेक्षा अव्वाच्या सव्वा युनिटचे बिल पाठविले जाते. महावितरणच्या या शेतकरी विरोधी कारभारास स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रतिबंध घालून शेतकऱ्यास न्याय मिळवून द्यावा, अन्यथा महावितरण विरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा शाम गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)