शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

रिडिंग न घेताच पाठविले जातात विजेची देयके

By admin | Updated: November 20, 2014 22:46 IST

महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना विद्युत बिलात ५० टक्के सुट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी महावितरणने नवीनच फंडा सुरू केला आहे.

लाखनी : महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना विद्युत बिलात ५० टक्के सुट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी महावितरणने नवीनच फंडा सुरू केला आहे. रिडींग न घेताच विद्युत बिल पाठविले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किती युनिट वीज वापरली व त्याचे बिल किती आले, हे कळत नाही. नंतरच्या बिलात मात्र भरपूर युनिट जळाल्याचे दाखवून शेतकऱ्यांकडून अधिकचे बिल वसूल केले जात आहे.लखनी तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या मिटरची रिडींग न घेताच बिल पाठविण्यात आले आहे. लागोपाठ दोन बिल भरल्यानंतर तिसऱ्या बिलात शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ५० टक्के मिळणाऱ्या सुटीपासून वंचित ठेवले जात आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याच्या इशारा दिला आहे.लाखनी येथील शेतकरी महादेव रामजी गिऱ्हेपुंजे यांचे शेतात मीटर क्रमांक एजीपी १५४१, ग्राहक क्रमांक ४४५५९०७७०२३१ विद्युत मिटर लावले असून पंपाद्वारे शेतातील पिकांना पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी योजना २०१४ वाणिज्य परिपत्रक क्रमांक २२३ नुसार यापूर्वीची दोन बिले, दिलेल्या मुदतीच्या आत भरणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबर २०१४ च्या बिलामध्ये ५० टक्के सुट देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार गिऱ्हेपुंजे यांनी सदर दोन बिल अविलंब भरले. परंतु महावितरणणे त्यांना ५० टक्के सुटीचे बिल देताना बिलात आरएनए रिडींग नाट अव्हेलेबल दाखवून १७५५ युनिटचेच बिल देवून फक्त ४१० रूपयाचीच सवलत दिली. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०१३ मध्ये ३७८५, मार्च २०१४ मध्ये ३५५७ युनिट व जून २०१४ मध्ये ३१३४ युनिटचे बिल भरले आहे. परंतु सप्टेंबर २०१४ च्या बिलामध्ये रिडींग उपलब्ध नाही. आरएनए असे दाखवून फक्त १७५५ युनिटचे बिल दिले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार या बिलात १९३३ युनिट कमी दाखवून, कृषी संजीवनी योनजेच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवून आर्थिक भुर्दंड बसविला आहे. यावरून शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळू द्यायचा नाही, असे महावितरणचे धोरण असल्याचे दिसून येते. एखादे मीटर नादुरूस्त असल्यास महावितरणद्वारे जळालेल्या युनिटपेक्षा अव्वाच्या सव्वा युनिटचे बिल पाठविले जाते. महावितरणच्या या शेतकरी विरोधी कारभारास स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रतिबंध घालून शेतकऱ्यास न्याय मिळवून द्यावा, अन्यथा महावितरण विरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा शाम गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)