शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

थकबाकीनंतरही लढविली संचालकांनी निवडणूक

By admin | Updated: April 11, 2017 00:35 IST

लाखनी येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे.

कुंपनच शेत खाते तेव्हा : प्रकरण लाखनी येथील अक्षय पतसंस्थेचेप्रशांत देसाई भंडारालाखनी येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. संस्थेच्या अध्यक्षासह अन्य तीन संचालकांनी केवळ ६ टक्के व्याजदराने कर्जाची उचल केली. कर्ज थकीत असतानाही नियमबाह्य रित्या निवडणूक लढण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.लाखनी येथील अक्षय नागरी पतसंस्थेत ३३ लाख ९९ हजार ३७० रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह आठ जणांविरुध्द लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरु असून पोलिसांनी पतसंस्थेचे कागदपत्र ताब्यात घेतले आहे. यात संस्थेचे अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव जगन्नाथ वरकड, उपाध्यक्ष उमराव बावनकुळे, कार्यवाह देवाजी पडोळे, सहकार्यवाह देवराम चाचेरे यांनी आणखी एक घोटाळा केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पदाचा गैरवापर करुन त्या चौघांनी संस्थेतून २००४ मध्ये कर्जाची उचल केली. या कर्जाची व्याज आकारणी त्यांनी केवळ ६ टक्के केली. यामुळे पतसंस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. ही लेखापरिक्षणात पुढे आली. याबाबत तत्कालीन लेखापरिक्षक यांनी परिक्षण अहवालानंतर सदर कर्ज प्रक्रिया चुकीची असल्याचे संचालकांना निदर्शनात आणून दिले होते. मात्र, संचालकांनी ते उडवून लावत. सर्व नियमबाह्य असल्याचे सांगितले होते. दरम्यान लाखनी पोलिसांनी अक्षय पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने संस्थेच्या स्थापनेपासूनचे कागदपत्र जप्त केले आहे. यात आता संस्थेने केलेल्या नोकरभरतीसह घेतलेले सर्व ठराव यांचा ही खडाणखडा तपास पोलीस करीत आहे. यात आणखी काही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सहा टक्के व्याजाने घेतले कर्जसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव वरकड यांनी २००४ मध्ये ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर उपाध्यक्ष उत्तमराव बावनकुळे यांनी ५ लाखांचे, कार्यवाह देवाजी पडोळे यांनी ५ लाखांचे तर सहकार्यवाह देवराम चाचेरे यांनी ५ लाखांच्या कर्जाची उचल केली. मात्र हे कर्ज केवळ सहा टक्के व्याज दराने घेतल्याचा गंभीर प्रकार आता उघडकीस आला आहे.सर्वसाधारण ग्राहकांची दिशाभूलपतसंस्थेच्या सभासदांना कर्जाची उचल करायची झाल्यास त्यांना १३ टक्के प्रचलीत व्याज दर द्यावे लागतात. ग्राहक व अन्य सभासदांकडून एकीकडे १३ टक्क्यांची कर्ज वसुली करण्यात येत असतांना संचालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी संस्थेला आर्थिक फटका देत केवळ ६ टक्के व्याजदराने कर्जाची उचल केली. हे नियमबाह्य असल्याची बाब उघडकीस आली आहे.नियम डावलून लढली निवडणूकअक्षय पतसंस्थेचे हे संचालक संस्थापक संचालक आहेत. अध्यक्ष वरकड, उपाध्यक्ष बावनकुळे, कार्यवाह पडोळे, सहकार्यवाह चाचेरे यांनी संस्थेतून २२ लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर याची परतफेड करण्यात आली नाही. सदर संचालक हे पतसंस्थेचे थकीत कर्जदार ठरले. दरम्यान पतसंस्थेची निवडणूक आली. त्यात हे चारही संचालक थकीत कर्जदार असल्याने निवडणूक लढू शकत नाही असा उपनिबंधक कार्यालयाचा नियम आहे. मात्र या नियमाला न जुमानता त्यांनी नियमबाह्यरित्या निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांना साथ देणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह संचालकांवरही आता संशयाची सुई बढावली आहे.खाते बंद करण्याची ठेवीदारांची मागणी पतसंस्थेच्या विश्वासर्हतेवर आता घोटाळ्यांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी पतसंस्थेमधील त्यांची खाती बंद करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. संचालकांनी नियम पायदळी तुडवत स्वत:चे स्वार्थ साधल्याचा घोटाळ्यानंतर आणखी काही घोटाळे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान खातेदारांच्या मागणीनुसार संचालक मंडळ आता जेरीस आले आहे.