शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

लग्नसराईत बसणार आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:47 IST

लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांची करडी नजर : वर-वधू पित्यांना होऊ शकतो मनस्ताप

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रभार भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथके तैनात केली असून त्यांच्या मार्फत वाहनांची तपासणी होत आहे.आचारसंहितेनुसार ३० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी विचारणा केली तर योग्य कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मात्र कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जमा करण्यात येणार आहे. लग्न सराईचा महिना असून शेतकरी नोकरीवर्ग मुलामुलींचे लग्न करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक नागरिक शहरात खरेदीसाठी येताना जवळ मोठ्या प्रमाणात रक्कम आणतात. त्यांनाही फटका बसणार आहे.लग्नात राजकीय नेते उपस्थित राहतील तर खबरदारी घ्यावी लागणार आहे. लग्नासाठी सोने, कपडे, भांडी खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बँकेतून काढल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे. सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.या निवडणुकीच्या हंगामात वर-वधूपित्यांना मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून चौकशी सुरु आहे. रोख रकमेबाबत मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.एप्रिल-मे महिन्यात १२ मुहूर्तएप्रिल व मे महिन्यात एकाच वेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्न सराईची झुंबड उडणार आहे. दोन महिन्यात १२ विवाह मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७, १८, २२, २४, २६, २७ व २८ तर मे महिन्यातसुद्धा काही विवाह मुहूर्त आहेत.महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्यांना फटकामहाराष्ट्रातून परराज्यात ये जा करणारे नागरिक व्यवसायीकांना त्रास सहन करावा लागणार आहे. परिराज्यातील व्यापाºयांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत असलेल्या पैशांबाबत योग्य कागदपत्रे व्यवसायीकांनी सोबत बाळगावी किंवा प्रशासनानी मागितल्यास सादर करावे लागतील.