शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:32 IST

आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याला नवी दृष्टी, नवा अर्थ आणि आकार देणं, स्वत:चं विश्व व्यापक आणि समृद्ध करणं आपल्या हाती आहे. कारण कुटुंब आणि समाज यांनी बहाल केलेलं उपेक्षित आणि अपमानित जीवन जगण्यापेक्षा जीवनातले हे अखेरचे पर्व देशासाठी, गरीबांसाठी, लाचार आणि गरजूसाठी समर्पित करावे. वार्धक्क्यातही जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे व प्रेरक आदर्श नजरेसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमृत बंसोड यांनी केले.

ठळक मुद्देअमृत बंसोड : जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा येथे सिनियर सिटिजनची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याला नवी दृष्टी, नवा अर्थ आणि आकार देणं, स्वत:चं विश्व व्यापक आणि समृद्ध करणं आपल्या हाती आहे. कारण कुटुंब आणि समाज यांनी बहाल केलेलं उपेक्षित आणि अपमानित जीवन जगण्यापेक्षा जीवनातले हे अखेरचे पर्व देशासाठी, गरीबांसाठी, लाचार आणि गरजूसाठी समर्पित करावे. वार्धक्क्यातही जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे व प्रेरक आदर्श नजरेसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमृत बंसोड यांनी केले.सिनियर सिटिजन्स मल्टिपरपज असोसिएशन भंडाराच्या वतीने आयोजित जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमृत बन्सोड होते. याप्रसंगी इंजि. रूपचंद रामटेके, एम.डब्ल्यु. दहिवले, करण रामटेके, महेंद्र गडकरी, निर्मला गोस्वामी, महादेव मेश्राम आदींची उपस्थिती होती. यावेळी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यात निवृत्ती हा पूर्ण विराम नसून आयुष्यातला तो एक स्वप्नविराम आहे. अजुन बरेच आयुष्य बाकी असते. नव नवीन गोष्टी शिकण्याची, करून बघण्याची उत्स्तुकता मावळायला नको. काळ बदलला, कुटुंब व्यवस्था बदलली, कुटुंब मर्यादित झालं एक किंवा दोन अपत्य असणारे आई-वडिल वृद्ध झाले की, त्यांच्या समस्या वाढतात. यामुळे जेष्ठांनी काळानुरूप बदलाना सामोरे जाणे किंबहुना बदल हसत हसत स्विकारणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे उतारवयातील जेष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या नाहीशा होऊ शकतात, असे विचार व्यक्त केले.संचालन गुलशन गजभिये यांनी केले. आभार आदिनाथ नागदेवे यांनी मानले. पुष्पा मेश्राम, सिमा बन्सोड यांचे सहकार्य लाभले.