शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:24 IST

तालुक्यातील आष्टी गावठाण फिडर कृषी फिडरला जोडण्यात आल्यामुळे कधी ट्रिपिंग तर कधी भारनियमनाचा फटका बसत असल्यामुळे नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहेत.

ठळक मुद्देकृषी फिडरशी जोडले गावठाण फिडर : सहा महिन्यांपासून महावितरणचे दुर्लक्ष

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील आष्टी गावठाण फिडर कृषी फिडरला जोडण्यात आल्यामुळे कधी ट्रिपिंग तर कधी भारनियमनाचा फटका बसत असल्यामुळे नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहेत. परंतू महावितरणने उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषीत भारनियमन होणे हे आता नित्याचे झाले आहे. परिणामी ग्रामीण जनता हताश झाली आहे. महावितरणने कृषी व घरगुती वीज धारकांसाठी थ्री फेज व सिंगल फेज योजना अंमलात आणून नवीन गावठान फिडरची स्थापना करून भारनियमनमुक्त करण्यात आले होते.मात्र मागील सहा महिन्यापासून आष्टी गावठान ११ केव्ही फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या फिडर अंतर्गत येणाºया चांदमाराटोली, डोंगरीबुज, टोली, लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा ही आठ गावे प्रभावित होत आहेत. त्यामुळे महावितरणने गावठान फिडरला कृषी फिडरशी तात्पुरती जोडणी केली व नागरिकांना होणारा त्रास कमी केला. परंतु कृषी फिडरच्या थ्री फेज लाईनवर भारनियमन तर आहेच याशिवाय आठ गावांचा भार वाढल्यामुळे वारंवार लाईट ट्रिप होणे तर कधी अनिश्चित वेळेसाठी लाईट बंद होणे, हा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत जगावे लागत आहे. याप्रकरणी महावितरणकडे मागील सहा महिन्यांपासून अनेकदा लेखी तक्रारी वरिष्ठ अधिकाºयांना केल्या. परंतु महावितरणने अद्याप लक्ष न दिल्यामुळे नागरिकांच्या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची आता सहनशिलता संपली असल्यामुळे असंतोष खदखदत आहे.याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून महावितरणने समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. याबाबत गोबरवाही उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अरविंद पंधरे यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.