शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा

By admin | Updated: October 10, 2016 00:30 IST

जेव्हा शिक्षक जागृत होईल, तेव्हाच विद्यार्थी घडेल. शिक्षकांकडून समाजाला चूक अभिप्रेत नाही.

शंकर राठोड यांचे प्रतिपादन : टेकेपार येथे केंद्रस्तरीय शिक्षक परिषदभंडारा : जेव्हा शिक्षक जागृत होईल, तेव्हाच विद्यार्थी घडेल. शिक्षकांकडून समाजाला चूक अभिप्रेत नाही. शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा आहे. शिक्षकांनी जर मनावर घेतले तर लाखो जिल्हाधिकारी तयार करू शकतात. त्यांनी आपल्या कामावर, पदावर गर्वाने काम केले पाहिजे, असा मौलिक सल्ला भंडारा पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी दिला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखडा कार्यक्रमांतर्गत धारगाव केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद विनोद विद्यालय टेकेपार (डोड.) येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना शंकर राठोड यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके, राजर्षी शिंदे, एच.पी. लांजेवार, सुधीर उके यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकर राठोड पुढे म्हणाले, शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षकांची सतत प्रयत्न करावे. शिक्षकांनी सकारात्म दृष्टीकोन ठेवून पालकांशी सतत संपर्क ठेवले तर गावाचे त्यांना सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी शिक्षक हा विद्यार्थी कसा घडवू शकतो. लहानशी चूक शिक्षकाला कशी भोवते, हे समजावून सांगितले. श्यामकर्ण तिडके म्हणाले, वर्गातील शेवटच्या बाकावर असलेला विद्यार्थी सुद्धा मागे राहू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा भावी पिढी घडविणारा आहे. यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. केंद्रप्रमुख राजर्षी शिंदे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखड्याची भूमिका समजावून सांगितले व शिक्षकांची याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे सांगितले. यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखड्याचे वाचन करण्यात आले. केंद्रातील काही शिक्षकांनी आपण वर्गात कसे शिकवितो, हे प्रत्यक्ष कृतीतून सांगितले.संचालन आचल दमाहे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक लांजेवार यांनी केले. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)