शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतूनच व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

लाखणी : इंग्रजी शिक्षणाला महत्त्व जरी दिले जात असले तरीही मातृभाषेतून शिक्षण पूर्ण करून स्वतःचे करिअर घडविणाऱ्याची संख्या ...

लाखणी : इंग्रजी शिक्षणाला महत्त्व जरी दिले जात असले तरीही मातृभाषेतून शिक्षण पूर्ण करून स्वतःचे करिअर घडविणाऱ्याची संख्या कुठेही कमी नाही. अनेक नोकऱ्यांमध्ये माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत घेऊन उच्च पदावरील नोकऱ्यांमध्ये असलेले असंख्य अधिकारी आपणास पाहता येतील.आपण स्वतः ग्रामीण भागात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून पूर्ण केले असल्याचे आणि या पदापर्यंत आलो असल्याचे विचार लाखनी येथील तहसीलदार मल्लिक विराणी यांनी सांगितले.

उच्च दर्जाचे आकलन होण्याकरिता मातृभाषा ही महत्त्वाची ठरते. वयोमानानुसार आकलनक्षमता वाढत जाते. आत्मविश्वासही वाढत जातो आणि मग उच्च माध्यमिक आणि पुढचे शिक्षण घेत असताना इंग्रजी सहज आत्मसात करता येते. आणि म्हणून मराठीमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या संयमाबरोबर पालकांचा सय्यमदेखील महत्त्वाचा ठरतो.

ही तयारी करत असताना धीर आणि आत्मविश्वास कुठेही कमी पडता कामा नये. असे विचार लाखणी लाखनी येथील तहसीलदार मल्लिक विराणी यांनी उज्ज्वल विद्यालय लाखोरी येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन पर भाषणात व्यक्त केले. यावेळी लाखणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे यांनीदेखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च दर्जाची समज व बुद्धिमत्ता आहे, मात्र माहितीचा अभाव मार्गदर्शनाअभावी हे विद्यार्थी मागे पडतात अभ्यासिका वर्गाच्या माध्यमातून यांना निश्चित मदत होईल रविकिरण वाचनालय व उज्ज्वल विद्यालय लाखोरी च्या या उपक्रमातून हे विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि निश्चितच आपले भविष्य घडवतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मंचावर उज्ज्वल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष गीता इलमे, कार्यवाह देवानंद चौधरी, रविकिरण वाचनालयाचे संस्थापक सुदाम वंजारी, कार्यवाह रवी सिंगनजुडे , पद्माकर सिंगनजुडे, सुमित्राबाई चौधरी, स्पर्धा परीक्षा कक्षाचे संयोजक अंगेश बेहलपाडे, सरपंचा अंजिराताई गणवीर, सुनील बांते, मारोती मेश्राम, विषतज्ज्ञ नरेश नखरे, ग्रा.पं.स. अनिलजी शेडे इ. मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती व पालकांची उपस्थिती लाभली होती. प्रास्ताविक अभ्यासिका कक्षाचे संयोजक अंगेश बेहलपाडे सूत्रसंचालन कल्पना सावरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश कंगाले, संजय खेडीकर, भीमराव मुटकुरे, अक्षय वाघाये ,भूपेश खेडीकर, शेखर कानतोडे, मयूर सिंगनजुडे, नीलेश भोयर, शिवम तितीरमारे, सतीश सार्वे, महेश उरकुडे, भानुदास चाचेरे, वर्षा मते, कुणाल कायते, सौरभ कायते आदींनी परिश्रम घेतले