शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

‘लेटलतीफ’ १० कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 00:14 IST

जिल्हा परिषद प्रशासनात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब नेहमीचा चर्चेचा विषय आहे.

शिक्षण विभागातील प्रकार : कारवाईच्या भीतीने कर्मचारी धास्तावलेभंडारा : जिल्हा परिषद प्रशासनात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब नेहमीचा चर्चेचा विषय आहे. वचक नसल्याने कर्मचारी कर्तव्यावर वेळेवर पोहचत नाही. मात्र शिक्षण विभागातील ‘लेटलतीफ’ दहा कर्मचाऱ्यांना नव्यानेच रुजू झालेले शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी नोटीस बजावले आहे. यामुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद इमारतीतून शिक्षण विभागाचा कारभार चालतो. मागील काही वर्षांपासून येथे नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने शिक्षण विभाग चर्चेत राहत आहे. नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारींवर येथील प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यभार सुरु होता. मात्र येथे नियमित शिक्षणाधिकारी म्हणून शासनाने रविकांत देशपांडे यांना भंडारा येथे पाठविले आहे. देशपांडे हे २७ जानेवारी भंडारा येथे रुजू झाले. सोमवारला त्यांनी सकाळी कार्यालय गाठले. दिवसभर त्यांनी कार्यालयीन कामाचे अवलोकन केले व अधिनस्थ कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांना कामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. मंगळवारला देशपांडे हे कार्यालयामध्ये सकाळी ९.४५ वाजताच दाखल झाले. शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ ही १० वाजताची आहे. मात्र शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी हे वेळ चुकूनही उपस्थित झाले नाही. त्यामुळे देशपांडे यांनी येथील ‘लेटलतीफ’ महिला अधिक्षकासह दहा कर्मचाऱ्यांना तातडीने उशिरा येण्याचे कारण दाखवा नोटीस बजावले. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली.दरम्यान दहाही लेटलतीफ कर्मचाऱ्यांनी नोटीस मिळताच ताबडतोब त्याचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. आज बुधवारला शिक्षण विभागातील नेहमीचेच ‘लेटलतीफ’ कर्मचारी कालच्या नोटीस मुळे आज वेळेवर कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्यालयात हजर झाले. नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यानी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याने ही शिस्त सदोदित रहावी अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)शासन नियमानुसार व चाकोरीत राहून सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यपालन करावे. कार्यालयात येण्याची वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र याला फाटा देत अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याने कामाचा खोळंबा होतो. यामुळे उशिरा आलेल्या दहा कर्मचाऱ्यांना पत्र देऊन त्याचे स्पष्टीकरण मागितले. - रविकांत देशपांडे, शिक्षणाधिकारी, (प्राथ.) भंडारा.