शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नदीकाठावरील ८७ हेक्टर जमीन गिळंकृत

By admin | Updated: December 23, 2015 00:46 IST

वैनगंगा व बावनथडी नदी खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना नद्याचे वाढते पात्र आता नुकसानकारक ठरत आहेत.

फटका बावनथडी नदीचा : १२५ कुटुंबाचे प्रथम टप्प्यात झाले पुनर्वसन, शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसानरंजित चिंचखेडे चुल्हाडवैनगंगा व बावनथडी नदी खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना नद्याचे वाढते पात्र आता नुकसानकारक ठरत आहेत. एकट्या बपेरा गावात ८७ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे सुपिक खोरे आहे. आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावाला बावनथडी नदीचे वाढते पात्र कवेत घेण्याच्या तयारीत आहे. नदीच्या वाढत्या पात्राची भीषणता लक्षात घेऊन राज्य शासनाने गावकऱ्यांच्या पुनर्वसनाला हिरवी झेंडी दिली असून १२५ कुटुंबाचे प्रथम टप्प्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. या वसाहतीत नागरी सुविधा पोहोचल्या आहेत. राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील १६७ कुटुंबियांच्या पुनर्वसन प्रक्रियेला दगा दिला आहे. याच गावात नाल्यासारखे दिसणारे नदीचे वाढते पात्र गावाच्या दिशेने आहे. या पात्रात गावातील शेतकऱ्यांची बागायती ८७ हेक्टर शेती गिळंकृत झाली आहे. सन १९९४-९५ या वर्षापासून नदीच्या पात्राने भीषणता वाढली आहे. या वाढत्या पात्राची साक्ष देणाऱ्या विहिरी उभ्या आहेत. शासकीय दरानुसार अडीच कोटीचे नुकसान झाले असले तरी मागील २० वर्षातील नुकसान कोट्यवधींची झाले आहे. शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. याशिवाय नदीपात्रात शेती गिळंकृत झाले असल्याने अनेकांचे सधन कुटुंब आता शेतमजूर झाले आहे. भूमिहीन असल्याचा ठपका अनेक शेतकरी कुटुंबावर आल्याने रोजगारासाठी अनेकांनी गावही सोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत रेती पसरली आहे. या रेतीचा लिलाव करीत महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही. शासनस्तरावर आर्थिक मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पाठपुरावा केला आहे. ६३ विहिरी नदीपात्रात गेल्याने या शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसला आहे. परंतु शासनस्तरावर या शेतकऱ्यांना विहीर देण्यात आली नाही. दरम्यान वैनगंगा नदी काठावरील माडगी ते बपेरापर्यंत शेतकऱ्यांचे शेतजमिनी नदीपात्रात गिळंकृत झालेल्या गावांमध्ये बोरी, उमरवाडा, कोष्टी, बाम्हणी, रेंगेपार, पांजरा, देवरी (देव), चुल्हाड, बपेरा, सुकळी (नकुल) या गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)