शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शहरात धूर फवारणीला ‘खाे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:36 IST

भंडारा : जिल्ह्यासह भंडारा शहरात कीटकजन्य आजाराला खतपाणी मिळत आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया व अन्य विषाणूजन्य तापाचे रुग्णसंख्या सातत्याने ...

भंडारा : जिल्ह्यासह भंडारा शहरात कीटकजन्य आजाराला खतपाणी मिळत आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया व अन्य विषाणूजन्य तापाचे रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. डेंग्यूने गत आठवड्याभरात दाेन जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. मात्र, भंडारा शहरात साधी धूर फवारणीही करण्यात आलेली नाही. नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल काय? असा सवाल नागरिक करत आहेत.

मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेली दडी व वातावरणात निर्माण झालेला प्रचंड उकाडा यामुळे कीटकजन्य आजार वाढले. या आजाराने थैमान घातले असतानाच ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढले आहेत. डेंग्यूचे जवळपास ३६ तर मलेरियाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रुग्णांनी हाऊसफुल दिसून येत आहेत. ताप, सर्दी, खाेकला, शाैच व अन्य आजारांची लक्षणे असलेली रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. डासांची संख्याही वाढत असताना जिल्ह्यात धूरफवारणीच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. त्याला काही ठिकाणी अपवादही आहे. शासन एकीकडे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक व सतर्क करत आहे. मात्र, दिव्याखाली अंधार या उक्तीचा परिचयही स्वत: शासन देत आहे.

भंडारा शहरातही धूरफवारणी करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांसह अन्य नागरिकांनी केली आहे. जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत आठवड्याभरापासून पाऊस बरसत असल्याने ताप आलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याला कारणीभूत असलेल्या डासांचे समूळ उच्चाटन हाेणे गरजेचे असताना त्या दिशेने पावले उचलल्याचे दिसून येत नाही.

भंडारा शहराची लाेकसंख्या पावणे दाेन लाखांच्या घरात आहे. अशा स्थितीत नाल्याची अवस्था चांगली नाही. विशेषत: सखल भागांत पाणी शिरते. अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती हाेत असते. अशा स्थितीत धूरफवारणी व कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी कारवाई हाेणे अपेक्षित हाेते.

सामाजिक संघटना सरसावली

भंडारा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थेची अवस्थाही हवी तितकी चांगली नाही. भंडारा शहरात डासांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तसेच विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने यावर प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे गरजेचे आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शहरात फाॅगिंग करावी, अशी मागणी जाॅय ऑफ गिव्हींगचे नितीन दुरगकर, डाॅ. नितीन तुरस्कर व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.