शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समाजाच्या गरजेसाठी वसुंधरेची गरज

By admin | Updated: July 9, 2017 00:33 IST

मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण थांबविणे आपल्या हातात आहे. आपल्या गरजेसाठी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे.

विविध स्पर्धांचे आयोजन : भारतीय सैनिकांचे भावनिक आवाहन लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण थांबविणे आपल्या हातात आहे. आपल्या गरजेसाठी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे. तापमानात प्रचंड वाढ व पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य येण्याची चिन्ह आहेत. पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे लावली जावी. आम्ही देशाचे संरक्षण करतो, तुम्ही समाजाच्या रक्षणाकरिता वृक्ष लावा अन् त्याचे संवर्धनही करा असे भावनिक आवाहन भारतीय सेनेत जम्मू काश्मिर येथे कार्यरत असलेले सैनिक आशिष वैद्य यांनी केले.दोन कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव / देवी येथे वृक्षारोपण व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी भारतीय सेनेतील बोथली येथील जवान आशिष वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार बांते होते. अतिथी म्हणून बोथली ग्रा.पं. सरपंच कैलाश तितीरमारे, रोहणाचे उपसरपंच नरेश ईश्वरकर, सामाजिक कार्यकर्ता मनोज ईश्वरकर तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक धनराज वैद्य, हंसराज भडके, गजानन वैद्य, शोभा कोचे, मोहन वाघमारे, लिलाधर लेंडे, श्रीहरी पडोळे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी वृक्ष लावा, जगवा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती. कार्यक्रमाप्रसंगी नरेश ईश्वरकर यांनी बेटी बचाव प्रमाणे झाडांचे जतन करा. नवीन रोपे लावा असे आवाहन केले. कैलाश तितीरमारे यांनी पर्जन्यमानाची क्षमता वाढविण्यासाठी वृक्ष लावले पाहिजेत असे सांगितले. हंसराज भडके यांनी, पर्यावरणाचा संबंध जगाशी येतो. निसर्गाचे संवर्धन करू तरच आपले संवर्धन होईल असे सांगितले. मनोज ईश्वरकर यांनी मनोगत व्यक्त केले. आठवीच्या विद्यार्थिनी ऋचिका भडके व मयुरी मडामे यांनी वृक्ष लागवडीचे लाभाविषयी मत मांडले.वृक्ष लागवड काळाची गरज या विषयावर भाषण स्पर्धा, चित्रस्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षिस देण्यात आले. यात प्राजक्ता ठवकर, मृणाली आगाशे, प्रशांत भडके, इम्रान बावणे, निशा बावणे, अस्मिता आंबीलकर, अर्पिता आंबीलकर, मयूरी मडामे, ऋचिता भडके, खुशी वैद्य, धनश्री लांबट, नेहा शेंडे, प्राप्ती बाभरे या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी शाळेच्या परिसरात भारतीय जवान आशिष वैद्य, नरेश ईश्वरकर, कैलाश तितीरमारे, मुख्याध्यापक राजकुमार बांते, शाळेतील शिक्षक, शिक्षिका तसेच हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे संचालन हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन गजानन वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास हरित सेनेच्या पथकाने सहकार्य केले. दहा वृक्ष लावा, जगवा, एक हजार घ्याविद्यार्थ्यांनी झाडे लावावीत. लावलेली झाडे जगवावी यासाठी शाळेच्या वतीने एक हजार रुपयाचे पारितोषिक ठेवले आहे. विद्यार्थ्यांनी कुठेही वृक्ष लागवड करावी. ठिकाणाची माहिती द्यावी, शाळेचे शिक्षक व हरित सेनेचे विद्यार्थी तपासणी करतील. उन्हाळ्यापर्यंत लावलेली दहाही झाडे जगली पाहिजेत. लावलेल्या दहा झाडांचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपयाचे बक्षिस शाळेतर्फे देण्यात येणारा नाविण्य उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी हाती घेतला आहे.