शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

समाजाच्या गरजेसाठी वसुंधरेची गरज

By admin | Updated: July 9, 2017 00:33 IST

मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण थांबविणे आपल्या हातात आहे. आपल्या गरजेसाठी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे.

विविध स्पर्धांचे आयोजन : भारतीय सैनिकांचे भावनिक आवाहन लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण थांबविणे आपल्या हातात आहे. आपल्या गरजेसाठी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे. तापमानात प्रचंड वाढ व पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य येण्याची चिन्ह आहेत. पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे लावली जावी. आम्ही देशाचे संरक्षण करतो, तुम्ही समाजाच्या रक्षणाकरिता वृक्ष लावा अन् त्याचे संवर्धनही करा असे भावनिक आवाहन भारतीय सेनेत जम्मू काश्मिर येथे कार्यरत असलेले सैनिक आशिष वैद्य यांनी केले.दोन कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव / देवी येथे वृक्षारोपण व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी भारतीय सेनेतील बोथली येथील जवान आशिष वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार बांते होते. अतिथी म्हणून बोथली ग्रा.पं. सरपंच कैलाश तितीरमारे, रोहणाचे उपसरपंच नरेश ईश्वरकर, सामाजिक कार्यकर्ता मनोज ईश्वरकर तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक धनराज वैद्य, हंसराज भडके, गजानन वैद्य, शोभा कोचे, मोहन वाघमारे, लिलाधर लेंडे, श्रीहरी पडोळे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी वृक्ष लावा, जगवा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती. कार्यक्रमाप्रसंगी नरेश ईश्वरकर यांनी बेटी बचाव प्रमाणे झाडांचे जतन करा. नवीन रोपे लावा असे आवाहन केले. कैलाश तितीरमारे यांनी पर्जन्यमानाची क्षमता वाढविण्यासाठी वृक्ष लावले पाहिजेत असे सांगितले. हंसराज भडके यांनी, पर्यावरणाचा संबंध जगाशी येतो. निसर्गाचे संवर्धन करू तरच आपले संवर्धन होईल असे सांगितले. मनोज ईश्वरकर यांनी मनोगत व्यक्त केले. आठवीच्या विद्यार्थिनी ऋचिका भडके व मयुरी मडामे यांनी वृक्ष लागवडीचे लाभाविषयी मत मांडले.वृक्ष लागवड काळाची गरज या विषयावर भाषण स्पर्धा, चित्रस्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षिस देण्यात आले. यात प्राजक्ता ठवकर, मृणाली आगाशे, प्रशांत भडके, इम्रान बावणे, निशा बावणे, अस्मिता आंबीलकर, अर्पिता आंबीलकर, मयूरी मडामे, ऋचिता भडके, खुशी वैद्य, धनश्री लांबट, नेहा शेंडे, प्राप्ती बाभरे या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी शाळेच्या परिसरात भारतीय जवान आशिष वैद्य, नरेश ईश्वरकर, कैलाश तितीरमारे, मुख्याध्यापक राजकुमार बांते, शाळेतील शिक्षक, शिक्षिका तसेच हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे संचालन हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन गजानन वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास हरित सेनेच्या पथकाने सहकार्य केले. दहा वृक्ष लावा, जगवा, एक हजार घ्याविद्यार्थ्यांनी झाडे लावावीत. लावलेली झाडे जगवावी यासाठी शाळेच्या वतीने एक हजार रुपयाचे पारितोषिक ठेवले आहे. विद्यार्थ्यांनी कुठेही वृक्ष लागवड करावी. ठिकाणाची माहिती द्यावी, शाळेचे शिक्षक व हरित सेनेचे विद्यार्थी तपासणी करतील. उन्हाळ्यापर्यंत लावलेली दहाही झाडे जगली पाहिजेत. लावलेल्या दहा झाडांचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपयाचे बक्षिस शाळेतर्फे देण्यात येणारा नाविण्य उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी हाती घेतला आहे.