शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

गतिमान प्रशासन हेच कामाचे सूत्र

By admin | Updated: June 3, 2015 00:46 IST

जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील राहून प्रशासन गतिमान करण्यावर आपला भर राहील.

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची ग्वाहीभंडारा : जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील राहून प्रशासन गतिमान करण्यावर आपला भर राहील. सिंचनाअभावी हरीतक्रांती रखडलेल्या गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे पुनवर्सन, तलावांचे पुनरूज्जीवन ही कामे प्राधान्यक्रमाने करण्यात येतील. ‘टीम वर्क’ वर आपला विश्वास असून पारदर्शक प्रशासन हेच आपल्या कामाचे सूत्र असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यात वने, तलाव, खनिज अशी खूप क्षमता असून त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात खरीपाच्या लागवड क्षेत्रापैकी रबीचे लागवड क्षेत्र कमी आहे. ते वाढविण्यासाठी योजना आखावी लागणार आहे. जिल्ह्यात टसर, मत्स्यपालन, ऊस पीक, हळदीचे पीक होत असून टसरचे क्लस्टर डिझाईन करण्यासाठी वाव आहे. ‘भंडारा सिल्क साडी’ या ब्रॉण्डने जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे, यासाठी काम करायचे आहे. नोव्हेबर महिन्यात खासदार नाना पटोले यांच्या कल्पनेतून साकार होणारा वैनगंगा महोत्सव साजरा करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे.जलयुक्त शिवार हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातंर्गत ४७० कामे घेण्यात आली असून ३५० कामे झालेली आहे. १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. भंडारा तलावांचा जिल्हा असल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत तलावांची देखभाल व दुरुस्ती करुन त्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.३ जूनपासून पर्यावरण सप्ताह गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून असा पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात वृक्ष लागवड व संवर्धन करायचे असून ८ ते १० लाख वृक्ष लागवड करण्यात येईल. यासाठी जनतेने कर्तव्य म्हणून सहकार्य केले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)- तर बॅकांविरुद्ध एफआयआरशेतकऱ्यांना ज्या बॅका कर्ज देणार नाही किंवा सक्तीने कर्ज वसुली केली तर अशा बॅकांविरुद्ध १३३, १८८ या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. गरज पडली तर एफआयआर सुद्धा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी स्पष्ट केले.ई-आॅफिस करणारयापूढे जिल्हा प्रशासनात पारदर्शक कामे होणार असून ही कामे जनतेला कळावी यासाठी आपली भविष्यात ‘ई-आॅफिस’ करण्याची संकल्पना आहे. जेवढी माहिती प्रशासनाकडे आहे ती माहिती जनतेला कळण्यासाठी संकेतस्थळावर टाकण्यात येईल. रेती तस्करी रोखणाररविवारच्या दिवशी रेती घाटातून उपसा करण्यात येऊ नये, असा नियम आहे. यापूढे कोणत्या घाटातून रेतीचा किती उपसा झाला याची नियमित नोटींग करण्यात येणार असून रेतीच्या तस्करीवर आळा घालण्यात येणार असल्याचे सांगितले.