शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

उड्डाणपूल पोचमार्गावर धुळच धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:57 IST

देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अ‍ॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अ‍ॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. संथगती कामाचा सर्वसामान्य नागरिकांना येथे फटका बसत असून कुणाचेच नियंत्रण येथे दिसत नाही. मागील चार वर्षापासून येथे काम सुरु आहेत.

ठळक मुद्देआजराला खतपाणी : फ्लाय अ‍ॅश मानवी शरीरराकरिता धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अ‍ॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अ‍ॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. संथगती कामाचा सर्वसामान्य नागरिकांना येथे फटका बसत असून कुणाचेच नियंत्रण येथे दिसत नाही. मागील चार वर्षापासून येथे काम सुरु आहेत.तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. देव्हाडी रेल्वे कॅबीन (फाटक) रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे. चार वर्षापुर्वी येथे प्रत्यक्ष उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोचमार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर मुख्य उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. प्रचंड वाहतुकीमुळे पोचमार्ग काही महिन्यातच खड्डेमय झाला. उड्डाणपूलाच्या भरावात फलॉय अ‍ॅश घालण्यात आली. ती अ‍ॅश पावसाळ्यात पोचमार्ग रस्त्यावर पसरली. सदर फलाय अ‍ॅश स्थानिक नागरिकांकरिता व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरली आहे.सदर महामार्गावर चोवीस तास वाहतुक सुरु असते. या रस्त्याशेजारी व परिसरात प्रचंड धुळ वातावरणात पाहावयास मिळते. वाहनधारकांना पुढील रस्ता दिसत नाही. इतकी धुळ येथील वातावरणात राहते. येथील कंत्राटदार थातुरमातुर रस्त्यावर पाणी घालतो. पाणी वाळल्यानंतर पुन्हा धूळ येथे उडते. ही धुळ आरोग्याला धोकादायक ठरतआहे.पोचमार्ग बांधकामाला परवानगीउड्डाणपूलाचे काम अजूनपूर्ण झााले नाही. पोचमार्ग खडडेमय झाल्याने संबंधित विभागाने पोचमार्ग दुरुस्तीकरीता १ कोटी २३ लाखांची निविदा काढली. एका पोचमार्ग येथे दोनदा तयार केला जात आहे. पहिल्या पोचमार्गाचा कार्यकाळ किती होता. उड्डाणपूल बांधकाम करण्याकडेच प्रथम पोचमार्गाची कामे होती. उड्डाणपूल बांधकामाच्या निश्चित कार्यकाळ किती आहे. या संबंधात कुठेच सुचना फलक लावण्यात आले नाही. एकाच पोचमार्गाचे नुतनीकरण येथे दुसऱ्यांदा होत असल्याने प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. उड्डाणपूल बांधकाम पूर्ण होईपर्यंत पोचमार्गाची देखभाल व दुरुस्ती प्रथम पोचमार्ग तयार करणाऱ्या कंत्राटदाराची नाही काय? असे प्रश्न येथे उपस्थित होत आहे.