शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

उड्डाणपूल पोचमार्गावर धुळच धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:57 IST

देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अ‍ॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अ‍ॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. संथगती कामाचा सर्वसामान्य नागरिकांना येथे फटका बसत असून कुणाचेच नियंत्रण येथे दिसत नाही. मागील चार वर्षापासून येथे काम सुरु आहेत.

ठळक मुद्देआजराला खतपाणी : फ्लाय अ‍ॅश मानवी शरीरराकरिता धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अ‍ॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अ‍ॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. संथगती कामाचा सर्वसामान्य नागरिकांना येथे फटका बसत असून कुणाचेच नियंत्रण येथे दिसत नाही. मागील चार वर्षापासून येथे काम सुरु आहेत.तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. देव्हाडी रेल्वे कॅबीन (फाटक) रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे. चार वर्षापुर्वी येथे प्रत्यक्ष उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोचमार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर मुख्य उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. प्रचंड वाहतुकीमुळे पोचमार्ग काही महिन्यातच खड्डेमय झाला. उड्डाणपूलाच्या भरावात फलॉय अ‍ॅश घालण्यात आली. ती अ‍ॅश पावसाळ्यात पोचमार्ग रस्त्यावर पसरली. सदर फलाय अ‍ॅश स्थानिक नागरिकांकरिता व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरली आहे.सदर महामार्गावर चोवीस तास वाहतुक सुरु असते. या रस्त्याशेजारी व परिसरात प्रचंड धुळ वातावरणात पाहावयास मिळते. वाहनधारकांना पुढील रस्ता दिसत नाही. इतकी धुळ येथील वातावरणात राहते. येथील कंत्राटदार थातुरमातुर रस्त्यावर पाणी घालतो. पाणी वाळल्यानंतर पुन्हा धूळ येथे उडते. ही धुळ आरोग्याला धोकादायक ठरतआहे.पोचमार्ग बांधकामाला परवानगीउड्डाणपूलाचे काम अजूनपूर्ण झााले नाही. पोचमार्ग खडडेमय झाल्याने संबंधित विभागाने पोचमार्ग दुरुस्तीकरीता १ कोटी २३ लाखांची निविदा काढली. एका पोचमार्ग येथे दोनदा तयार केला जात आहे. पहिल्या पोचमार्गाचा कार्यकाळ किती होता. उड्डाणपूल बांधकाम करण्याकडेच प्रथम पोचमार्गाची कामे होती. उड्डाणपूल बांधकामाच्या निश्चित कार्यकाळ किती आहे. या संबंधात कुठेच सुचना फलक लावण्यात आले नाही. एकाच पोचमार्गाचे नुतनीकरण येथे दुसऱ्यांदा होत असल्याने प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. उड्डाणपूल बांधकाम पूर्ण होईपर्यंत पोचमार्गाची देखभाल व दुरुस्ती प्रथम पोचमार्ग तयार करणाऱ्या कंत्राटदाराची नाही काय? असे प्रश्न येथे उपस्थित होत आहे.