शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:44 IST

धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.

ठळक मुद्देफिरत्या पोलीस ठाण्याला प्रतिसाद : नागरिकांचा वेळ व पैशाची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या शेती हंगामात शेतकरी व शेतमजूर व्यस्त आहेत.अशा काळातपोलिसांनी त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी निपटारा करण्याचे काम सुरु केले आहे. आंधळगाव क्षेत्रांतर्गत पांढराबोडी येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्या दोन्ही तक्रारींचा निपटारा करण्यात आला. बँकींग फसवणूक, एटीएम, फ्रॉड, ग्रामसुरक्षा, चोरी आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पवनी तालुक्यातील निष्टी येथे पोलीस निरीक्षक चकाटे यांनी जनतेला वाहतुकीचे मार्गदर्शन केले. याठिकाणी एक प्रकरण दाखल झाले. पालांदूर पोलीस ठाणे अंतर्गत जेवनाळा येथे महिला अत्याचाराविषयक मार्गदर्शन करण्यात आले.लाखांदूर ठाण्यांतर्गत मेंढा येथे पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. करडी ठाण्यांतर्गत कान्हळगाव येथे ठाणेदार पेंड यांनी आॅनलाईन फ्रॉडबाबत आणि अटक वॉरंटबाबत मार्गदर्शन केले. लाखनी ठाण्यांतर्गत खेडेपार येथेही फिरत्या ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस व जनतेत विश्वासाचे नातेफिरते पोलीस ठाणे केवळ गुन्हेच नोंंदवून घेत नाही तर विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाते. त्यात बँकींग फसवणूक, घरफोडी, चोरी, अंधश्रद्धा निर्मूलन, तक्रार कशी दाखल करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. दारुबंदीबाबतही मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. कामाचा हंगाम असतानाही नागरिक या फिरत्या पोलीस ठाण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यातून पोलीस व जनतेत विश्वासाचे नाते निर्माण होत आहे.नागरिकांनी फिरत्या पोलीस ठाणे उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या, तक्रारी सोडवून घ्याव्यात. विनाकारण प्रकरण न्यायालयापर्यंत नेऊ नये. आपल्या वेळेची व पैशाची बचत करून गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधिक्षक,भंडारा.