शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:44 IST

धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.

ठळक मुद्देफिरत्या पोलीस ठाण्याला प्रतिसाद : नागरिकांचा वेळ व पैशाची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या शेती हंगामात शेतकरी व शेतमजूर व्यस्त आहेत.अशा काळातपोलिसांनी त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी निपटारा करण्याचे काम सुरु केले आहे. आंधळगाव क्षेत्रांतर्गत पांढराबोडी येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्या दोन्ही तक्रारींचा निपटारा करण्यात आला. बँकींग फसवणूक, एटीएम, फ्रॉड, ग्रामसुरक्षा, चोरी आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पवनी तालुक्यातील निष्टी येथे पोलीस निरीक्षक चकाटे यांनी जनतेला वाहतुकीचे मार्गदर्शन केले. याठिकाणी एक प्रकरण दाखल झाले. पालांदूर पोलीस ठाणे अंतर्गत जेवनाळा येथे महिला अत्याचाराविषयक मार्गदर्शन करण्यात आले.लाखांदूर ठाण्यांतर्गत मेंढा येथे पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. करडी ठाण्यांतर्गत कान्हळगाव येथे ठाणेदार पेंड यांनी आॅनलाईन फ्रॉडबाबत आणि अटक वॉरंटबाबत मार्गदर्शन केले. लाखनी ठाण्यांतर्गत खेडेपार येथेही फिरत्या ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस व जनतेत विश्वासाचे नातेफिरते पोलीस ठाणे केवळ गुन्हेच नोंंदवून घेत नाही तर विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाते. त्यात बँकींग फसवणूक, घरफोडी, चोरी, अंधश्रद्धा निर्मूलन, तक्रार कशी दाखल करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. दारुबंदीबाबतही मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. कामाचा हंगाम असतानाही नागरिक या फिरत्या पोलीस ठाण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यातून पोलीस व जनतेत विश्वासाचे नाते निर्माण होत आहे.नागरिकांनी फिरत्या पोलीस ठाणे उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या, तक्रारी सोडवून घ्याव्यात. विनाकारण प्रकरण न्यायालयापर्यंत नेऊ नये. आपल्या वेळेची व पैशाची बचत करून गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधिक्षक,भंडारा.