शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:44 IST

धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.

ठळक मुद्देफिरत्या पोलीस ठाण्याला प्रतिसाद : नागरिकांचा वेळ व पैशाची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या शेती हंगामात शेतकरी व शेतमजूर व्यस्त आहेत.अशा काळातपोलिसांनी त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी निपटारा करण्याचे काम सुरु केले आहे. आंधळगाव क्षेत्रांतर्गत पांढराबोडी येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्या दोन्ही तक्रारींचा निपटारा करण्यात आला. बँकींग फसवणूक, एटीएम, फ्रॉड, ग्रामसुरक्षा, चोरी आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पवनी तालुक्यातील निष्टी येथे पोलीस निरीक्षक चकाटे यांनी जनतेला वाहतुकीचे मार्गदर्शन केले. याठिकाणी एक प्रकरण दाखल झाले. पालांदूर पोलीस ठाणे अंतर्गत जेवनाळा येथे महिला अत्याचाराविषयक मार्गदर्शन करण्यात आले.लाखांदूर ठाण्यांतर्गत मेंढा येथे पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. करडी ठाण्यांतर्गत कान्हळगाव येथे ठाणेदार पेंड यांनी आॅनलाईन फ्रॉडबाबत आणि अटक वॉरंटबाबत मार्गदर्शन केले. लाखनी ठाण्यांतर्गत खेडेपार येथेही फिरत्या ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस व जनतेत विश्वासाचे नातेफिरते पोलीस ठाणे केवळ गुन्हेच नोंंदवून घेत नाही तर विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाते. त्यात बँकींग फसवणूक, घरफोडी, चोरी, अंधश्रद्धा निर्मूलन, तक्रार कशी दाखल करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. दारुबंदीबाबतही मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. कामाचा हंगाम असतानाही नागरिक या फिरत्या पोलीस ठाण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यातून पोलीस व जनतेत विश्वासाचे नाते निर्माण होत आहे.नागरिकांनी फिरत्या पोलीस ठाणे उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या, तक्रारी सोडवून घ्याव्यात. विनाकारण प्रकरण न्यायालयापर्यंत नेऊ नये. आपल्या वेळेची व पैशाची बचत करून गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधिक्षक,भंडारा.