शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

चुकीच्या आकडेवारीमुळे जिल्हा लाभापासून वंचित राहू नये

By admin | Updated: April 22, 2016 01:53 IST

खरीप हंगामपुर्व नियोजन आढावा बैठकीत सादर करण्यात आलेल्या नियोजन अहवालात अनेक त्रृटया आहेत.यामुळे

भंडारा: खरीप हंगामपुर्व नियोजन आढावा बैठकीत सादर करण्यात आलेल्या नियोजन अहवालात अनेक त्रृटया आहेत.यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर चुकीची माहिती जावू शकते. तसेच चुकीचे आकडेवारीमुळे जिल्हा लाभापासून वंचित राहता कामा नये. यासाठी जलसंपदा विभाग, जिल्हापरिषद लघुपाटबंधारे, जिल्हा उपनिबंधक आणि कृषि विभागांनी समन्वयाने अहवाल दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी दिले.जिल्हा परिषद सभागृहात आयोजित हंगाम २०१६ च्या पुर्व नियोजन आढावा बैठकीत डॉ. सावंत बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर,पोलीस अधीक्षक विनीता साहू उपस्थित होते. खरीप हंगाम पुर्व नियोजन बैठकीत अचुक आकडेवारी सादर न केल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केल्यामुळे पुढील बैठक मंगळवारी मुंबई येथे घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला अचूक आकडेवारीसह नियोजनबध्द अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. बोगस बियाणे आढळल्यास तालुकास्तरीय समितीने संबंधित कृषि केंद्रावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असतांना कृषि विभागाने आज पर्यंत एकही गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न खासदार नाना पटोले यांनी उपस्थित केला. यावर शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी यांनी दिली. तक्रार मागे घेण्यासंदर्भात कंपन्या शेतकऱ्यांवर दबाव टाकतात, असा आरोप शेतकऱ्यांंकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तडजोड केली तरीही कायदयानुसार यापुढे बोगस बियाणे आढळल्यास कृषि केंद्रावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले. सन २०१४-१५ मध्ये अ ग्रेड धानाची खरेदी ८,६५२ क्विंटल होती. ती यावर्षी कमी कशी झाली तसेच अ ग्रेड धान निकषाबाबत सदस्यांकडून विचारण्यात आले. यावेळी जिल्हा पणन अधिकारी समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्याचबरोबर धान खरेदी केंद्रावर वेळोवेळी भेटी घेणे, धानाची ग्रेडींग तपासणी व बारदाण्याच्या उपलब्धतेबाबत आढावा घेणे हे काम जिल्हास्तरीय समितीचे आहे. त्यामुळे हे काम न करणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस द्याावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हयातील किती शेतकऱ्यांना सावकारी कजार्तून मुक्तता मिळाली आणि ज्या सावकारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशा किती सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात केले. याबाबत सदस्यांनी माहिती विचारली. यावर ७ हजार २८४ प्रकरणांना जिल्हा समितीने मान्यता दिली आणि ५ हजार ४६३ शेतकऱ्यांचे सोने सावकाराने परत केले. तसेच उर्वरित प्रकरणावर कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली. यावर तुमसर तालुक्यातील सावकारांकडून कर्ज घेतलेल्या किती शेतकऱ्यांची फसवणूक सावकारांनी केली. आणि कितीवर गुन्हा दाखल केला याचा सविस्तर अहवाल संबंधित आमदार आणि मला सादर करावा, अशा सूचना केल्यात. प्रत्यक्षात होणारे सिंचनाची खरी आकडेवारी समोर न आल्यामुळे नुकसानीची बाब नाना पटोले यांनी निदर्शनास आणली. (प्रतिनिधी)