शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

किडींमुळे ८,४०९ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:38 IST

आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही ...

ठळक मुद्देअहवाल सादर : ३३,५७५ शेतकऱ्यांना फटका

आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही शेतकºयांनी तशीच पाडून ठेवली होती. काही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने उशिरा धानाची रोवणी केली. इथेही पावसाने दगा दिला. धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. दुसरीकडे गोदामाअभावी धान उघड्यावर आहेत.हो नाही म्हणता पेंच प्रकल्पाचे पाणी सुटले. त्यामुळे काही प्रमाणात धानाचे पीक तरले. ओंब्यावर धानपीक आले. पण शेतकऱ्यांच्या दुर्देवी नशिबाने साथ सोडली नाही. धानाच्या ओंब्या भरत असताना किडींनी आक्रमण केले. तुडतुड्याने धान पिकाला तोडून टाकले. लोंबी मातीत मिसळल्या. काही शेतकऱ्यांन घाबरून ओल्या लोंबीचे धान कापून टाकले.पण, नुकसान झालेच नाही. यावर्षी खरीप पिकावर निसर्गाचे दृष्टचक्र फिरत आहे. शेतकरी फार चिंतीत पडले आहेत. मळणी करतानीही शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. धानाची खोपी बघून मळणीचा दाम ठरविला गेला. उत्पादन कमी, तणस जास्त यामुळे मळणी मालक नुकसान करून घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी पिळला गेला. उत्पादन दहा पोत्याचे किंमत वसूल वीस पोत्यांचे. हा यावर्षी अनुभव शेतकºयांनी घेतला.तालुका कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार मोहाडी यांच्या संयुक्तपणे सर्वेक्षण करण्यात आला आहे. किडीमुळे बाधीत धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.३३ टक्केच्या खाली ३३,५७५ शेतकरीदोन दिवसानंतर मोहाडी तालुक्याची अंतिम आणेवारी हाती येणार आहे. निश्चितच पन्नास पैशाच्या आत आणेवारी राहील असे संकेत प्रशासनाने दिले. तथापि तुडतुड्यामुळे धानपिकाचे राजस्व मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोहाडी तालुक्यातील १०८ गावात ३३ टक्केच्या वर ८ हजार ४०९ हेक्टर मध्ये धान पिकाचे नुकसान तुडतुड्याने केले आहे. ३३ टक्केच्या खाली नुकसान १३ हजार ८८४ हेक्टर क्षेत्रामध्ये झाले आहे. यात ३३ टक्केच्या वर नुकसान पात्र शेतकरी ३१ हजार ५६९ तर ३३ टक्केच्या खाली ३३५७५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.