शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

किडींमुळे ८,४०९ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:38 IST

आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही ...

ठळक मुद्देअहवाल सादर : ३३,५७५ शेतकऱ्यांना फटका

आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही शेतकºयांनी तशीच पाडून ठेवली होती. काही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने उशिरा धानाची रोवणी केली. इथेही पावसाने दगा दिला. धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. दुसरीकडे गोदामाअभावी धान उघड्यावर आहेत.हो नाही म्हणता पेंच प्रकल्पाचे पाणी सुटले. त्यामुळे काही प्रमाणात धानाचे पीक तरले. ओंब्यावर धानपीक आले. पण शेतकऱ्यांच्या दुर्देवी नशिबाने साथ सोडली नाही. धानाच्या ओंब्या भरत असताना किडींनी आक्रमण केले. तुडतुड्याने धान पिकाला तोडून टाकले. लोंबी मातीत मिसळल्या. काही शेतकऱ्यांन घाबरून ओल्या लोंबीचे धान कापून टाकले.पण, नुकसान झालेच नाही. यावर्षी खरीप पिकावर निसर्गाचे दृष्टचक्र फिरत आहे. शेतकरी फार चिंतीत पडले आहेत. मळणी करतानीही शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. धानाची खोपी बघून मळणीचा दाम ठरविला गेला. उत्पादन कमी, तणस जास्त यामुळे मळणी मालक नुकसान करून घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी पिळला गेला. उत्पादन दहा पोत्याचे किंमत वसूल वीस पोत्यांचे. हा यावर्षी अनुभव शेतकºयांनी घेतला.तालुका कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार मोहाडी यांच्या संयुक्तपणे सर्वेक्षण करण्यात आला आहे. किडीमुळे बाधीत धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.३३ टक्केच्या खाली ३३,५७५ शेतकरीदोन दिवसानंतर मोहाडी तालुक्याची अंतिम आणेवारी हाती येणार आहे. निश्चितच पन्नास पैशाच्या आत आणेवारी राहील असे संकेत प्रशासनाने दिले. तथापि तुडतुड्यामुळे धानपिकाचे राजस्व मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोहाडी तालुक्यातील १०८ गावात ३३ टक्केच्या वर ८ हजार ४०९ हेक्टर मध्ये धान पिकाचे नुकसान तुडतुड्याने केले आहे. ३३ टक्केच्या खाली नुकसान १३ हजार ८८४ हेक्टर क्षेत्रामध्ये झाले आहे. यात ३३ टक्केच्या वर नुकसान पात्र शेतकरी ३१ हजार ५६९ तर ३३ टक्केच्या खाली ३३५७५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.