शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

संगणकाच्या वापरामुळे ग्रंथालय प्रेमींमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:36 IST

संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रंथालयप्रेमींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाचनात घट : दृश्य मनोरंजन झाले सर्वांवर हावी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रंथालयप्रेमींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.आपले मुखोद्गत साहित्य शब्दबद्ध केल्याने ते वाचायला सोपे झाले आणि आजपर्यंत टिकून राहिले. तंत्रज्ञानाने उत्तरोत्तर केलेल्या प्रगतीने आज सर्व लिखित स्वरूपातील ज्ञान संगणकावर जसेच्या तसे व एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. पूर्वीवाचन म्हटले की, पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता; पण संगणकाने याची सोय केल्याने ग्रंथालयात जाऊन वा ग्रंथालयातून पुस्तक आणून ते वाचण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. आज शासनाने विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाचनाची सवय लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' सारख्या योजना सुरू केल्या; पण मनोरंजनाची अनेक साधणे घरीच उपलब्ध झाल्याने वाचन कमी झाले. पर्यायाने वाचनालयात जाणेही कमी झाले आहे.जुन्या पिढीच्या लोकांची वाचनाची सवय आजही कायम आहे; पण नवीन पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. नाटक, कथा, कांदबऱ्या, कवितासंग्रह, आत्मचरित्र हे वाचण्याजोगे साहित्य आहे; पण आज हे सर्व टीव्हीवर पाहण्यातच नवी पिढी धन्यता मानत आहे. शालेय वाचनाची जागाही आता ई-लर्निंगने घेतली आहे. पुस्तके घरी असणे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे; पण आता ती जागा संगणकाने घेतली आहे. पुस्तके वाचणे चेष्टेचा विषय ठरत आहे.ई-लर्निंगचा धडाका'वाचाल तर वाचाल' अशी म्हण पूर्वीप्रचलित होती; पण पुस्तकांची जागा आता ई-लर्निंगच्या साहित्याने घेतल्याचे दिसून येत आहे. बदलल्या काळात शाळांतही ई-लर्निंगचा धडाका असल्याने पुस्तकांचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी नाटकांची पुस्तके, कथा, कादंबरी आदी मनोरंजनाची साधने होती; पण टीव्हीरूपी मनोरंजनामुळे वाचनाकडे सामान्यांचे दुर्लक्ष होत असून जुन्या व नवीन पिढीमध्ये दुरावाही निर्माण होत असल्याचेच दिसून येत आहे.