शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

संगणकाच्या वापरामुळे ग्रंथालय प्रेमींमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:36 IST

संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रंथालयप्रेमींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाचनात घट : दृश्य मनोरंजन झाले सर्वांवर हावी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रंथालयप्रेमींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.आपले मुखोद्गत साहित्य शब्दबद्ध केल्याने ते वाचायला सोपे झाले आणि आजपर्यंत टिकून राहिले. तंत्रज्ञानाने उत्तरोत्तर केलेल्या प्रगतीने आज सर्व लिखित स्वरूपातील ज्ञान संगणकावर जसेच्या तसे व एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. पूर्वीवाचन म्हटले की, पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता; पण संगणकाने याची सोय केल्याने ग्रंथालयात जाऊन वा ग्रंथालयातून पुस्तक आणून ते वाचण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. आज शासनाने विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाचनाची सवय लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' सारख्या योजना सुरू केल्या; पण मनोरंजनाची अनेक साधणे घरीच उपलब्ध झाल्याने वाचन कमी झाले. पर्यायाने वाचनालयात जाणेही कमी झाले आहे.जुन्या पिढीच्या लोकांची वाचनाची सवय आजही कायम आहे; पण नवीन पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. नाटक, कथा, कांदबऱ्या, कवितासंग्रह, आत्मचरित्र हे वाचण्याजोगे साहित्य आहे; पण आज हे सर्व टीव्हीवर पाहण्यातच नवी पिढी धन्यता मानत आहे. शालेय वाचनाची जागाही आता ई-लर्निंगने घेतली आहे. पुस्तके घरी असणे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे; पण आता ती जागा संगणकाने घेतली आहे. पुस्तके वाचणे चेष्टेचा विषय ठरत आहे.ई-लर्निंगचा धडाका'वाचाल तर वाचाल' अशी म्हण पूर्वीप्रचलित होती; पण पुस्तकांची जागा आता ई-लर्निंगच्या साहित्याने घेतल्याचे दिसून येत आहे. बदलल्या काळात शाळांतही ई-लर्निंगचा धडाका असल्याने पुस्तकांचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी नाटकांची पुस्तके, कथा, कादंबरी आदी मनोरंजनाची साधने होती; पण टीव्हीरूपी मनोरंजनामुळे वाचनाकडे सामान्यांचे दुर्लक्ष होत असून जुन्या व नवीन पिढीमध्ये दुरावाही निर्माण होत असल्याचेच दिसून येत आहे.