शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासकामांना खीळ

By admin | Updated: November 22, 2014 22:56 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.

भंडारा : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना शासनाच्या नियमाचे पालन न करता अनेक ग्रामसेवक अपडाऊन करीत आहेत. त्यांच्या अपडाऊनमुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकासात्मक कामांना खीळ बसते, तसेच जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा विकास व्हावा यासाठी शासन विविध विकासात्मक योजना कार्यान्वित करून करोडो रूपये खर्च करते. मात्र प्रत्यक्ष यंत्रणेतील अंमलबजावणी काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे न बजावता कामात कुचराई करीत असल्याने अनेक विकास कामे अपेक्षेनुसार होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच विकासाच्या कामात टक्केवारी हे प्रकार अलीकडे जास्तच उदयास आल्याने विकास कामाचा दर्जा बेसुमार घसरतो. याशिवाय ग्रामस्थांना विविध कामासाठी दाखल्याची आवश्यकता असते. मात्र अनेकदा दाखला देण्यास विलंब होत असल्याने अनेकांना योजनेपासून वंचित राहण्याची पाळी येते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता वेळेत दाखल्याची आवश्यकता असते. भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यास नॉट रिचेबल दाखविण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जाब विचारल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ठिकाणी बैठकी असल्याची वेळकाढू कारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांच्यावर असते. परंतु हे अधिकारी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)