शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासकामांना खीळ

By admin | Updated: November 22, 2014 22:56 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.

भंडारा : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे.शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना शासनाच्या नियमाचे पालन न करता अनेक ग्रामसेवक अपडाऊन करीत आहेत. त्यांच्या अपडाऊनमुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकासात्मक कामांना खीळ बसते, तसेच जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा विकास व्हावा यासाठी शासन विविध विकासात्मक योजना कार्यान्वित करून करोडो रूपये खर्च करते. मात्र प्रत्यक्ष यंत्रणेतील अंमलबजावणी काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे न बजावता कामात कुचराई करीत असल्याने अनेक विकास कामे अपेक्षेनुसार होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच विकासाच्या कामात टक्केवारी हे प्रकार अलीकडे जास्तच उदयास आल्याने विकास कामाचा दर्जा बेसुमार घसरतो. याशिवाय ग्रामस्थांना विविध कामासाठी दाखल्याची आवश्यकता असते. मात्र अनेकदा दाखला देण्यास विलंब होत असल्याने अनेकांना योजनेपासून वंचित राहण्याची पाळी येते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता वेळेत दाखल्याची आवश्यकता असते. भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यास नॉट रिचेबल दाखविण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जाब विचारल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ठिकाणी बैठकी असल्याची वेळकाढू कारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. या ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचे काम पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांच्यावर असते. परंतु हे अधिकारी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)