शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

दुबार पेरणीच्या संकटाने बळीराजा चिंतातूर

By admin | Updated: July 9, 2017 00:29 IST

यंदा ९५ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खाते व पारंपारिक पद्धतीने पावसाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलेला होता.

पावसाने दिला दगा : शेततळे पडले कोरडे, गोसेखुर्द धरणात अत्यल्प जलसाठा, आर्थिक फटका बसणारअशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : यंदा ९५ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खाते व पारंपारिक पद्धतीने पावसाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलेला होता. प्रसार माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना माहिती झाल्याने शेतकरी सुखावला होता. बळीराजाने पिकाचे गणित करून, पेरणीला प्रारंभ केला. आतापर्यंत तीन नक्षत्रात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला. पवसाने दगा दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झालेला आहे.तालुक्यात गोसेखुर्द हे मोठे धरण झाले आहे. परंतू धरणात जलसाठा नाही. तलावांची संख्या खूप आहे. परंतू पावसाअभावी तलाव कोरडे आहेत. विहिर व विंधन विहिरींची पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. ज्यांचेकडे पाणी उपलब्ध आहे त्यांना विद्युतच्या लोडेशडींगचा प्रचंड त्रास आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणता निर्णय घ्यावा हे त्यांना समजणे कठीण आहे. मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात झाली. थोडाफार पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांने स्वत:जवळचे किंवा विकत घेवून धानाचे बियाणे पेरले, पऱ्हा टाकला आणि नेमका त्यानंतर पावसाने दगा दिला. आता धानाचे पऱ्हे वाळू लागले आहेत. पुनर्वसू नक्षत्रात सुरूवात होवून पाच दिवस उलटले परंतू पावसाचा पत्ता नाही. अटीतटीच्या प्रसंगी कामात बाधा म्हणून शेतकऱ्यांनी शेततळे बांधले परंतू पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेततळे देखील कोरडे आहेत पऱ्हे जगवणार कसे, मुख्य धरणाचे काम करण्यासाठी गोसेखुर्द धरणातील पाणी सोडून धरण रिकामे करण्यात आले. पाणी संचयासाठी पावसाची गरज होती. परंतु पाऊस पडलेला नाही. धरणात कालवा कोरडा आहे. कालव्याद्वारे सिंचनाची सोय उन्हाळी धानपिकाला देण्यात आलेली नाही. खरीप हंगामात देखील शक्यता नाही. झालेली पेरणी किंवा धानाचे पऱ्हे कसे जगवणार. महागडे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. रासायनिक खताचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. मजूरांवर खूप मोठा खर्च करावा लागणार आहे. मात्र पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकरी अस्मानी संकटात सापडणार आहे. भविष्याचे संकट पाहून शेतकरी पूर्णत: हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, तरच शेतकरी चिंतातूर होईल.