शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीच्या संकटाने बळीराजा चिंतातूर

By admin | Updated: July 9, 2017 00:29 IST

यंदा ९५ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खाते व पारंपारिक पद्धतीने पावसाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलेला होता.

पावसाने दिला दगा : शेततळे पडले कोरडे, गोसेखुर्द धरणात अत्यल्प जलसाठा, आर्थिक फटका बसणारअशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : यंदा ९५ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खाते व पारंपारिक पद्धतीने पावसाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलेला होता. प्रसार माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना माहिती झाल्याने शेतकरी सुखावला होता. बळीराजाने पिकाचे गणित करून, पेरणीला प्रारंभ केला. आतापर्यंत तीन नक्षत्रात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला. पवसाने दगा दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झालेला आहे.तालुक्यात गोसेखुर्द हे मोठे धरण झाले आहे. परंतू धरणात जलसाठा नाही. तलावांची संख्या खूप आहे. परंतू पावसाअभावी तलाव कोरडे आहेत. विहिर व विंधन विहिरींची पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. ज्यांचेकडे पाणी उपलब्ध आहे त्यांना विद्युतच्या लोडेशडींगचा प्रचंड त्रास आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणता निर्णय घ्यावा हे त्यांना समजणे कठीण आहे. मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात झाली. थोडाफार पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांने स्वत:जवळचे किंवा विकत घेवून धानाचे बियाणे पेरले, पऱ्हा टाकला आणि नेमका त्यानंतर पावसाने दगा दिला. आता धानाचे पऱ्हे वाळू लागले आहेत. पुनर्वसू नक्षत्रात सुरूवात होवून पाच दिवस उलटले परंतू पावसाचा पत्ता नाही. अटीतटीच्या प्रसंगी कामात बाधा म्हणून शेतकऱ्यांनी शेततळे बांधले परंतू पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेततळे देखील कोरडे आहेत पऱ्हे जगवणार कसे, मुख्य धरणाचे काम करण्यासाठी गोसेखुर्द धरणातील पाणी सोडून धरण रिकामे करण्यात आले. पाणी संचयासाठी पावसाची गरज होती. परंतु पाऊस पडलेला नाही. धरणात कालवा कोरडा आहे. कालव्याद्वारे सिंचनाची सोय उन्हाळी धानपिकाला देण्यात आलेली नाही. खरीप हंगामात देखील शक्यता नाही. झालेली पेरणी किंवा धानाचे पऱ्हे कसे जगवणार. महागडे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत. रासायनिक खताचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. मजूरांवर खूप मोठा खर्च करावा लागणार आहे. मात्र पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकरी अस्मानी संकटात सापडणार आहे. भविष्याचे संकट पाहून शेतकरी पूर्णत: हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, तरच शेतकरी चिंतातूर होईल.