शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

रेतीघाटांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: December 10, 2015 00:42 IST

नदीत वाहणाऱ्या पाण्यासोबत वैनगंगा व बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची रेती वाहून येते.

नदीपात्रात रेती नसतानाही रेती घाटांचा लिलावमोहन भोयर तुमसरनदीत वाहणाऱ्या पाण्यासोबत वैनगंगा व बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची रेती वाहून येते. परंतु, मागील सात वर्षापासून रेती वाहून येण्याचे प्रमाण कमी होत आहे. याउलट रेतीचा प्रचंड उपसा सुरू असल्यामुळे नदीपात्रात रेतीच नसल्याचे चित्र आहे. रेतीघाटांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून वैनगंगा व बावनथडी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वैनगंगा व बावनथडी या दोन नद्या तुमसर तालुक्यातून वाहतात. मध्यप्रदेशातून त्यांचा उगम होतो. बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. पाण्याचा प्रवाहासोबतच रेतीसाठा नदीपात्रात जमा होतो. शेकडो वर्षापासून ही निरंतर प्रक्रिया सुरू आहे. बावनथडी नदीवर बावनथडी सिंचन प्रकल्प तयार झाला. वैनगंगा नदीवर वाहनी-मांडवी येथे ४५० कोटींचा बॅरेज तयार करण्यात आला. येथून धापेवाडा सिंचन प्रकल्प व अदानी वीज उद्योगाला पाणी देण्यात येते. याकरिता पाणी अडविण्यात येते. बॅरेजनंतर पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो. या प्रवाहासोबत पावसाळ्या व्यतिरिक्त रेतीचा प्रवाह येणे बंद झाल्याचे चित्र आहे. सध्या या दोन्ही नद्यांच्या पात्रात खडकाळ रेती तेवढी शिल्लक आहे. काही ठिकाणी मातीमिश्रीत रेती आहे. एकेकाळी पांढऱ्या शुभ्र चकाकणाऱ्या रेतीचा साठा येथील नदीपात्रात होता. महसूलाचे उद्दिष्ट गाठण्याच्या स्पर्धेत महसूल विभागाने या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.दरवर्षी नित्याने रेतीघाटांचा लिलाव करण्यात येतो. कोट्यवधींची बोली लागते. त्यामुळे रेतीचा प्रचंड उपसा होत असतो. रेती उपशाचे कठोर नियम असले तरी २४ तास निगराणी ठेवणे महसूल प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे.सन २०१५ मध्ये तुमसर तालुक्यातील सुकळी रेतीघाट ६९.६९ लाख, चारगाव ६७.५५ लाख, बाम्हणी ८५.५० लाख, देवनारा ११.७२ लाख, तामसवाडी ८५ लाख, लोभी २०.६० लाख, वारपिंडकेपार २८ लाख, आष्टी ३५ लाख ४ कोटी ३ लाख ९ हजार ६१ रुपयांचा लिलाव झाला.याव्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात ५ रेतीघाट ५ कोटी ४१ लाख, ६९ हजार, मोहाडी तालुक्यात ६ रेतीघाट ३ कोटी ८२ लाख, साकोली तालुक्यात ४ रेतीघाट ३१ लाख ९५ हजार, लाखनी तालुक्यात ४ रेतीघाट ४७ लाख ३६ हजार, लाखांदूर तालुक्यात २ रेतीघाट १ कोटी २७ लाख, भंडारा टाकळी रेतीघाट १ कोटी ५९ लाख एकूण २९ रेती घाटातून १६ कोटी ९२ लाख ६१ हजार ५५८ रूपयांचा महसूल राज्य शासनाला मिळाला होता.यावर्षी महसूल विभागाने रेतीघाट लिलाव प्रक्रियेला मान्यता दिली असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. तुमसर तालुक्यात किमान ५ ते ६ कि़मी. वर एक रेतीघाटाच्या लिलावाला मान्यता देण्यात आली आहे. भुजल सर्व्हेक्षण विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग, महसूल विभाग रेतीघाटांना अंतिम मान्यता देते. तुमसर तालुक्यात महसूल प्रशासनाने गौण खनिजांकरिता १३ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. वाजवीपेक्षा जास्त उद्दिष्ट येथे देण्यात आले, असे दिसून येते.रेतीघाट लिलावाकरिता पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्राची गरज असते. जिल्हा खनीकर्म विभाग तथा पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत शासन रेतीघाटाचे लिलाव प्रक्रिया पूर्ण करीत असते. जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव हा शासकीय नियमानुसारच अनेक बिंदूचा विचार केल्यानंतरच केल्या जातो. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील रेंगेपार (पांजरा) रेतीघाट लिलाव करण्यात आला आहे.- डी.टी. सोनवानेतहसीलदार, तुमसर.