शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

पावसाच्या दडीने शेतकऱ्यांना हवे नेरला उपसा सिंचनाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

अडयाळ : गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी अडयाळ परिसरात नेरला उपसा सिंचन सुरू ...

अडयाळ : गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी अडयाळ परिसरात नेरला उपसा सिंचन सुरू झाल्याशिवाय शेकडो शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण होऊ शकणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांकडून अंदाजित ७० लाख रुपये पाणीकर येणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी फक्त अंदाजित दीड ते दोन लाख रुपये पाणीकर जमा झाला असल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ पाणीपट्टीकर भरावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी हे सर्व शेतकऱ्यांना हवे असले, तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीकर रक्कम बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी गावातील पाणीवापर संस्था तथा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचे अधिकारी तथा कर्मचारी तथा आंबाडी कार्यालय यांच्याकडे तत्काळ रक्कम भरावी, असे आवाहन नेरला उपसा सिंचनने केले आहे. काही शेतकरी यासाठी पुढे येऊन थकबाकी भरताना दिसत आहेत.

गुरुवारी आलेल्या पावसामुळे पऱ्हे कसेतरी वाचले आहेत. पण, अजूनही धोका टळलेला नाही. याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. कारण, पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. हीच स्थिती राहिली तर मग शेतकऱ्यांनी रोवणी करायची कधी? निसर्गाच्या लहरीपणामुळे नेरला उपसा सिंचनकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. प्रत्येक वेळी पाणी आणीबाणीच्या स्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका मुख्य ठरते आहे. बुधवारपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणीसुद्धा सोडण्यात आले नाही, तर मग परिस्थिती बिकट होण्याच्या मार्गावर होती. परंतु, गुरुवारी पडलेल्या पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हे पुन्हा डोलू लागले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी निसर्गाचे आभार मानत आहेत. आज पुन्हा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे धास्तावले आहेत. याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून नेरला उपसा सिंचनाचे पाणी द्यावे, अशीही मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.