शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पावसाच्या दडीने शेतकऱ्यांना हवे नेरला उपसा सिंचनाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

अडयाळ : गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी अडयाळ परिसरात नेरला उपसा सिंचन सुरू ...

अडयाळ : गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी अडयाळ परिसरात नेरला उपसा सिंचन सुरू झाल्याशिवाय शेकडो शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण होऊ शकणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांकडून अंदाजित ७० लाख रुपये पाणीकर येणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी फक्त अंदाजित दीड ते दोन लाख रुपये पाणीकर जमा झाला असल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ पाणीपट्टीकर भरावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी हे सर्व शेतकऱ्यांना हवे असले, तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीकर रक्कम बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी गावातील पाणीवापर संस्था तथा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचे अधिकारी तथा कर्मचारी तथा आंबाडी कार्यालय यांच्याकडे तत्काळ रक्कम भरावी, असे आवाहन नेरला उपसा सिंचनने केले आहे. काही शेतकरी यासाठी पुढे येऊन थकबाकी भरताना दिसत आहेत.

गुरुवारी आलेल्या पावसामुळे पऱ्हे कसेतरी वाचले आहेत. पण, अजूनही धोका टळलेला नाही. याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. कारण, पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. हीच स्थिती राहिली तर मग शेतकऱ्यांनी रोवणी करायची कधी? निसर्गाच्या लहरीपणामुळे नेरला उपसा सिंचनकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. प्रत्येक वेळी पाणी आणीबाणीच्या स्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका मुख्य ठरते आहे. बुधवारपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणीसुद्धा सोडण्यात आले नाही, तर मग परिस्थिती बिकट होण्याच्या मार्गावर होती. परंतु, गुरुवारी पडलेल्या पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हे पुन्हा डोलू लागले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी निसर्गाचे आभार मानत आहेत. आज पुन्हा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे धास्तावले आहेत. याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून नेरला उपसा सिंचनाचे पाणी द्यावे, अशीही मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.