शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

रेल्वे उड्डान पूल ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:52 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे, उड्डाण पुलाअंतर्गत अंडरपास, सब-वे हे कमी उंचीचे व सदोष बांधण्यात आल्याने ते ठिकाण अपघातग्रस्त स्थळाचे बनणार आहे.

ठळक मुद्देबसथांब्यासाठी जागेचा अभाव : 'अंडरपास'मुळे अपघाताची शक्यता

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे, उड्डाण पुलाअंतर्गत अंडरपास, सब-वे हे कमी उंचीचे व सदोष बांधण्यात आल्याने ते ठिकाण अपघातग्रस्त स्थळाचे बनणार आहे. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागणार असल्याने रेल्वेचा तो उड्डाणपुल देव्हाडीवासीयांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे.दिल्ली, मुंबई-बिलासपूर अशा एक नव्हे तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे या तुमसर (रोड) देव्हाडी जंक्शन वरून दररोज १५० च्या घरात रेल्वे धावतात. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना रेल्वे क्रॉसिंगवर, तासन्तास ताटकळत राहावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलासाठी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने रेल्वे उड्डाणपुलाला ५० टक्के निधी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारने देण्याचे मान्य करून मंजुरी दिली. त्यानंतर या कामाला सुरूवात झाली. त्यामुळे आता पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र उड्डानपुलाच्या सदोष बांधकामामुळे देव्हाडीवासीयांसाठी तो पुल त्रासदायक व धोकादायक ठरणार आहे. कारण त्या उड्डानपुलातंर्गत कमी उंचीचे अंडरपास सब-वे तयार करण्यात आले. ज्या पद्धतीने रेल्वे उड्डानपुलाचा बांधकाम होत आहे. त्यानुसार देव्हाडी (तुमसर रोड) येथे जाण्याकरिता कोणतीही बस तिथे थांबणार नाही. बस थांब्याकरिता जागा नाही.एसटी थांबवायचे झाल्यास तिला गावाबाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर थांबावे लागणार आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानिक हे मोठे रेल्वे जंक्शन असल्यामुळे दररोज येथे हजारो प्रवाशी कटंगी, तिरोडी, खैरलांजी, वाराशिवनी, तिरोडा, तुमसर, साकोली, मोहाडी या ठिकाणाहून येतात. रात्री अपरात्री रेल्वे येत असल्यामुळे देव्हाडी गावात वाहनांची वर्दळ असते. त्यात तुमसर-रामटेककडे जाणारा अंडरपास (सब-वे) व गोंदियाकडे जाणारा अंडरपास हा कमी उंचीचा असून त्या ठिकाणाहून जडवाहने टर्न होऊ शकत नाही. त्याठिकाणी अपघात होऊन जनतेला नाहक त्रासाला सामोरे जाण्याची चिंता सतावू लागल्यामुळे देव्हाडी ग्रामपंचायतने ठराव घेऊन रेल्वे व राज्य सरकारला पुलाच्या विस्तारीकरणासाठी विनंती केली. परंतु अद्यापही त्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ता खुशाल नागपुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.