शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मुरुम खननामुळे कोसरा वितरिकेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:39 IST

नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे.

ठळक मुद्देदिवसरात्र खनन : चुºहाड येथील प्रकार

आॅनलाईन लोकमतकोंढा-कोसरा : नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे. मुरुम खनन करणाऱ्यांनी वितरिकेचा देखील विचार न केल्याने कोसरा वितरिकेला धोका निर्माण झाला आहे.शासनाच्या उदासीन धोरणामुळे नेरला उपसा सिंचन योजना सध्या बंद आहे. या योजनेस निधी अत्यल्प उपलब्ध होत असल्याने वितरिकेचे काम बंद आहे सोनेगाव (फाटा) जवळून कोसरा वितरिका तयार होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या.कोसरा वितरिकेच्या कालव्यालगत चुऱ्हाड (कोसरा) येथे कंत्राटदार व इतर लोकांनी मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे या वितरिकेला धोका निर्माण झाला आहे. चुऱ्हाड हे अड्याळ कोंढा या मार्गावर असलेले जवळपास ३०० लोकवस्तीचे गाव आहे. राज्यमार्गावर असलेल्या गावालगत भरपूर सरकारी जागा आहे. या जागेत दिवसरात्र उत्खनन करुन मोठमोठे तलाव, बोळी निर्माण केलीमुरुम खनन करणाऱ्यांनी जेसीबी मशिनद्वारे अगदी कोसरा वितरिकेला लागून खनन केले असून मोठे खड्डे निर्माण केले आहे. पण यासर्व प्रकाराकडे विदर्भ पाटबंधारे विभाग आंबाडी येथील अधिकारी, अभियंता यांचे दुर्लक्ष होत आहे.भंडारा पवनी राज्यमार्गाने महसूल विभागाचे तहसीलदार, पवनी, राजस्व निरीक्षक, तलाठी कर्मचारी येणे-जाणे करतात. पण त्यांना चुऱ्हाड येथे अवैध उत्खननातून मोठे खड्डे पडलेले दिसत नाही. सध्या महसुल विभागाकडून मुरुम उत्खननाची परवानगी घ्यायची त्यानंतर हजारो ब्रास मुरुम उत्खनन करायचे हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.अवैध मुरुम उत्खननाचा अड्डा चुऱ्हाड राज्यमार्गालगत गट ग्रामपंचायत कोसरा अंतर्गत चुऱ्हाड ये गाव येते. या गावाच्या आजूबाजूला भरपूर सरकारी जागा आहे. वनविभागाची नर्सरी व जागृत हनुमंतांचे मंदिर असलेल्या भागात रात्रीच्या सुमारास जेसीबीद्वारे खनन केले जाते, पण कोणीही याकडे लक्ष देत नाही. कोंढा येथील एका संस्थापकाने सरकारी जागेला लागून अर्धा एकर जागा घेतली. तेथून केव्हाही मुरुम खनन केले जाते. या खननामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात आहे.दुसरीकडे पर्यावरणाला धोका पोहचत आहे. मुरुम उत्खनन करणाऱ्या लोकांनी कालवा देखील सोडला नाही. मुरुम खननाची योग्य चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.