शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

खननामुळे आंतरराज्यीय पुलाला धोकातुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 3, 2016 00:27 IST

रेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्षमोहन भोयर  तुमसररेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील महकेपार बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे पुलाला यापूर्वी तडे गेले आहे. तशीच पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर - कटंगी आंतरराज्यीय मार्गावर नाकाडोंगरी व बोनकट्टा दरम्यान वैनगंगा नदीवर पूल आहे. पुलाची लांबी मोठी आहे. पुलांच्या खांबाजवळील परिसरातील रेतीचा उपसा प्रचंड प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या खांबाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. ही रेती मॉईल प्रशासन नेत असल्याची माहिती आहे. चिखला येथे मॅग्नीजची भूमीगत खाण आहे. मॅग्नीज काढल्यावर रिकाम्या पोकळीत रेती भरल्या जाते. सुमारे ३० ते ३५ वर्षाकरिता खाण प्रशासनाला भाडे तत्वावर रेती खनन करण्याची परवानगी राज्य शासनाच्या महसूल विभागाने दिली आहे.केंद्र शासनाच्या खाणीत ही रेती नेत असल्याने राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. पूर्व विदर्भातून बालाघाट येथे हाच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी रहदारी आहे.महाराष्ट्राच्या सीमेतून रेती उपसा केली जाते. मोठ्या प्रमाणात येथे रेती उपसा सुरु आहे. किमान पुलाच्या खांबाजवळून रेती उपस्यास बंदी करण्याची गरज आहे. रेती उत्खननाचे नियम आहेत. त्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. महकेपार - बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे एका पुलाला तडे गेल्याने मध्यप्रदेश शासनाने पुलावरून वाहतूक बंद केली आहे. त्या पुलाची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेशुमार रेती उपस्यावर नियमानुसार महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाईची गरज आहे. वैनगंगा नदीत सध्या पाणी आहे. नदीच्या प्रवाहामुळे नवीन रेती येण्याची शक्यता जास्त आहे. किती प्रमाणात रेती वाहून येते त्यावर त्या पुलाचे भविष्य निर्भर आहे. शासनाने ही बाब गंभीरतेने घेण्याची नक्कीच गरजेचे आहे. पाण्याचा जोरदार प्रवाहाचा परिणाम पुलावर तांत्रिकदृष्ट्या जास्त होता. रेतीमुळे पुलाचे संरक्षण होते हे विशेष. पुल परिसरातून किमान ५० ते ७० मिटर अंतरापर्यंत रेती खननाला बंदी घालण्याची आवश्यकता आहे.वैनगंगा नदीत पाणी आहे. त्यामुळे पुलाखालील खांबाजवळील रेतीचा अंदाज घेणे शक्य नाही. मॉईल प्रशासनाने तिथून रेतीचा उपसा केला असेल तर त्यांना महसूल विभाग रितसर पत्र देऊन माहिती मागेल. नदीच्या प्रवाहासोबत रेती येण्याची शक्यता निश्चितच आहे. यापुढे पुलाजवळ रेती उत्खननास बंदी केली जाईल.-एन.पी.गौंड, नायब तहसीलदार तुमसर