शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

खननामुळे आंतरराज्यीय पुलाला धोकातुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 3, 2016 00:27 IST

रेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्षमोहन भोयर  तुमसररेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील महकेपार बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे पुलाला यापूर्वी तडे गेले आहे. तशीच पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर - कटंगी आंतरराज्यीय मार्गावर नाकाडोंगरी व बोनकट्टा दरम्यान वैनगंगा नदीवर पूल आहे. पुलाची लांबी मोठी आहे. पुलांच्या खांबाजवळील परिसरातील रेतीचा उपसा प्रचंड प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या खांबाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. ही रेती मॉईल प्रशासन नेत असल्याची माहिती आहे. चिखला येथे मॅग्नीजची भूमीगत खाण आहे. मॅग्नीज काढल्यावर रिकाम्या पोकळीत रेती भरल्या जाते. सुमारे ३० ते ३५ वर्षाकरिता खाण प्रशासनाला भाडे तत्वावर रेती खनन करण्याची परवानगी राज्य शासनाच्या महसूल विभागाने दिली आहे.केंद्र शासनाच्या खाणीत ही रेती नेत असल्याने राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. पूर्व विदर्भातून बालाघाट येथे हाच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी रहदारी आहे.महाराष्ट्राच्या सीमेतून रेती उपसा केली जाते. मोठ्या प्रमाणात येथे रेती उपसा सुरु आहे. किमान पुलाच्या खांबाजवळून रेती उपस्यास बंदी करण्याची गरज आहे. रेती उत्खननाचे नियम आहेत. त्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. महकेपार - बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे एका पुलाला तडे गेल्याने मध्यप्रदेश शासनाने पुलावरून वाहतूक बंद केली आहे. त्या पुलाची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेशुमार रेती उपस्यावर नियमानुसार महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाईची गरज आहे. वैनगंगा नदीत सध्या पाणी आहे. नदीच्या प्रवाहामुळे नवीन रेती येण्याची शक्यता जास्त आहे. किती प्रमाणात रेती वाहून येते त्यावर त्या पुलाचे भविष्य निर्भर आहे. शासनाने ही बाब गंभीरतेने घेण्याची नक्कीच गरजेचे आहे. पाण्याचा जोरदार प्रवाहाचा परिणाम पुलावर तांत्रिकदृष्ट्या जास्त होता. रेतीमुळे पुलाचे संरक्षण होते हे विशेष. पुल परिसरातून किमान ५० ते ७० मिटर अंतरापर्यंत रेती खननाला बंदी घालण्याची आवश्यकता आहे.वैनगंगा नदीत पाणी आहे. त्यामुळे पुलाखालील खांबाजवळील रेतीचा अंदाज घेणे शक्य नाही. मॉईल प्रशासनाने तिथून रेतीचा उपसा केला असेल तर त्यांना महसूल विभाग रितसर पत्र देऊन माहिती मागेल. नदीच्या प्रवाहासोबत रेती येण्याची शक्यता निश्चितच आहे. यापुढे पुलाजवळ रेती उत्खननास बंदी केली जाईल.-एन.पी.गौंड, नायब तहसीलदार तुमसर