शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीने 'मिनी मंत्रालय' पडले ओस

By admin | Updated: September 27, 2014 01:17 IST

सर्व सामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून मिनी मंत्रायल म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते.

भंडारा : सर्व सामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून मिनी मंत्रायल म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते. विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजल्याने पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविली आहे. तर काहींनी स्वत:च उमेदवारी दाखल केल्याने त्यांना आता विधानसभेत पोहचण्याचे डोहाळे लागले आहे.जिल्हा परिषदेला ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा संबोधल्या जाते. याला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. अशा मिनी मंत्रायलयातून राजकारणाची कास धरलेल्या अनेकजणांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या काही विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही आपले नशीब अजमाविण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुका होणार असल्याने अनेक दावेदारांनी आपल्या विजयाच्या गणितांची गोळाबेरीज केली आहे. काहींनी जातीच्या तर काहींनी केलेल्या विकासोपयोगी कामाच्या भरोशावर त्यांची उमेदवारी कशी प्रबळ राहिल हे पटवून दिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आता शेवटचे दिवस उरले आहेत. तसतसे पक्षांनी जाहिर केलेले तर काही बंडोबांनीही आपले उमेदवारी अर्ज सादर करून एकमेकांसमोर आवाहन उभे केले आहे. या निवडणुकीचा ज्वर आता जिल्हा परिषदेतही दिसू लागला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेचा फेरफटका मारला असता, अर्थ व बांधकाम सभापती वगळता अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य सभापतींचे कक्ष रिकामे दिसून आले. मुळात हे पदाधिकारीच जिल्हा परिषदेकडे आज भटकले नाही. हे पदाधिकारी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकरिता किंवा राजकीय गोळाबेरीज जमविण्यात मशगुल असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचीही हजेरी आता बोटावर मोजण्या इतकी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्यांना त्यांचे पदाधिकारी किंवा जिल्हा परिषद सदस्य भेटत नसल्याने त्यांची कामे खोळंबून असल्याने आल्यापावली परतावे लागत आहे.ऐरवी पदधिकारी नेहमी जिल्हा परिषदेत उपस्थित राहत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा व शासकीय कामे करणाऱ्यांची मोठी भाऊगर्दीने फुलण जाणारी जिल्हा परिषद आता निवडणुकीमुळे ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)