शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निर्णयाअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: March 21, 2015 01:16 IST

मार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून

प्रशांत देसाई ल्ल भंडारामार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत अद्याप सुरू झालेल्या नाहीत. चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शाळा सकाळपाळीत न घेण्याचा विषय चर्चेला आला होता. या निर्णयाला शिक्षण विभागाने विरोध केला नाही. परिणामी शाळा सकाळपाळीत सुरू न झाल्यामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्णयात चिमुकले विद्यार्थी भरडले जात आहेत.आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात बदल झाला आहे. मार्च महिन्याच्या उष्णतेच्या प्रखरतेचा विचार करुन शिक्षण सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळपाळीत घेण्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू झालेल्या आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यातील शाळा याला अपवाद ठरलेल्या आहेत.मार्च महिना तापू लागला असून उष्णतेमुळे अनेकांनी दुपारी घरातून बाहेर निघणे बंद केले आहे. कुलर व वातानुकुलित यंत्र सुरू झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्यात न आल्यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. याबाबत, शिक्षण विभागाने निरनिराळी कारणे पुढे केली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता तपासणी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे सकाळपाळीत शाळा सुरू केल्यास दिवसभर शाळा बंद राहते यामुळे तपासणीच्या कार्यात अडथळा येणार होणार असल्यामुळे शाळा सकाळ पाळीत न करता सध्या दुपारपाळीतच सुरू ठेवण्यात येत असल्याचे कारण समोर केले आहे. आरोग्यावर परिणाम४सध्या ३४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा कौलारू व कमी उंचीच्या असल्याने लवकर तापतात. काही शाळांची वीज जोडणी कापलेली असल्याने पंखे बंद आहेत. विद्यार्थी दिवसभर शाळेत असल्यामुळे त्यांना उन्हाच्या झळा बसत आहेत. पाण्याची भीषणता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सकाळी शाळेनंतर विद्यार्थी दिवसभर घरी एकटाच राहतो. त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोणीही नसल्याने जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शाळा सकाळपाळीत घेऊ नये, असा ठराव घेण्यात आला. सभागृहाचा निर्णय बंधनकारक आहे. शिक्षण सचिवांचे पत्र प्राप्त झाले नसून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतल्या जातो.- एकनाथ मडावीशिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद भंडारा.ग्रामीण पालक रोहयोच्या कामावर जात असल्याने त्यांचे विद्यार्थी दिवसभर घरी राहतात. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते व क्वचितप्रसंगी त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण होतो. मार्चनंतर शाळा सकाळी सुरू करण्यात येईल. सध्या तापमानात वाढ झाली नाही. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली, परंतू ठराव घेण्यात आलेला नाही.- रमेश पारधीशिक्षण सभापती, जिल्हा परिषद भंडारा.जिल्ह्यातील तापमानात वाढ होत आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडू शकतो. प्रखर उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा सामना करावा लागेल. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे शाळेतील पंखे बंद राहत असल्याने गर्मीत विद्यांना उकळावे लागणार. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहिल.मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.