शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

निर्णयाअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: March 21, 2015 01:16 IST

मार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून

प्रशांत देसाई ल्ल भंडारामार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत अद्याप सुरू झालेल्या नाहीत. चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शाळा सकाळपाळीत न घेण्याचा विषय चर्चेला आला होता. या निर्णयाला शिक्षण विभागाने विरोध केला नाही. परिणामी शाळा सकाळपाळीत सुरू न झाल्यामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्णयात चिमुकले विद्यार्थी भरडले जात आहेत.आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात बदल झाला आहे. मार्च महिन्याच्या उष्णतेच्या प्रखरतेचा विचार करुन शिक्षण सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळपाळीत घेण्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू झालेल्या आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यातील शाळा याला अपवाद ठरलेल्या आहेत.मार्च महिना तापू लागला असून उष्णतेमुळे अनेकांनी दुपारी घरातून बाहेर निघणे बंद केले आहे. कुलर व वातानुकुलित यंत्र सुरू झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्यात न आल्यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. याबाबत, शिक्षण विभागाने निरनिराळी कारणे पुढे केली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता तपासणी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे सकाळपाळीत शाळा सुरू केल्यास दिवसभर शाळा बंद राहते यामुळे तपासणीच्या कार्यात अडथळा येणार होणार असल्यामुळे शाळा सकाळ पाळीत न करता सध्या दुपारपाळीतच सुरू ठेवण्यात येत असल्याचे कारण समोर केले आहे. आरोग्यावर परिणाम४सध्या ३४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा कौलारू व कमी उंचीच्या असल्याने लवकर तापतात. काही शाळांची वीज जोडणी कापलेली असल्याने पंखे बंद आहेत. विद्यार्थी दिवसभर शाळेत असल्यामुळे त्यांना उन्हाच्या झळा बसत आहेत. पाण्याची भीषणता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सकाळी शाळेनंतर विद्यार्थी दिवसभर घरी एकटाच राहतो. त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोणीही नसल्याने जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शाळा सकाळपाळीत घेऊ नये, असा ठराव घेण्यात आला. सभागृहाचा निर्णय बंधनकारक आहे. शिक्षण सचिवांचे पत्र प्राप्त झाले नसून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतल्या जातो.- एकनाथ मडावीशिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद भंडारा.ग्रामीण पालक रोहयोच्या कामावर जात असल्याने त्यांचे विद्यार्थी दिवसभर घरी राहतात. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते व क्वचितप्रसंगी त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण होतो. मार्चनंतर शाळा सकाळी सुरू करण्यात येईल. सध्या तापमानात वाढ झाली नाही. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली, परंतू ठराव घेण्यात आलेला नाही.- रमेश पारधीशिक्षण सभापती, जिल्हा परिषद भंडारा.जिल्ह्यातील तापमानात वाढ होत आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडू शकतो. प्रखर उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा सामना करावा लागेल. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे शाळेतील पंखे बंद राहत असल्याने गर्मीत विद्यांना उकळावे लागणार. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहिल.मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.