शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीत कृत्रिम भारनियमनाने पाणीटंचाई

By admin | Updated: July 3, 2016 00:24 IST

देव्हाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला. विहिरीचा उपसा ग्रामपंचायतीने केला नाही.

जलवाहिनीला गळती : नियोजनाचा अभाव, ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हतुमसर : देव्हाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला. विहिरीचा उपसा ग्रामपंचायतीने केला नाही. मुख्य जलवाहिनी वारंवार फूटत असल्याने नागरिकांना महिन्याभरापासून केवळ एकच वेळ पाणी मिळत आहे. पाणी वितरीत करताना जून्या वस्तीत अधिक वेळ पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीमध्ये नियोजनाचा अभाव आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.देव्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे साडे सहा हजाराच्यावर आहे. तालुक्याची सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग व मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर वसले आहे. वैनगंगा नदी येथून केवळ तीन कि़मी. अंतरावर आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गोंदिया मार्गावर आहे. सुमारे ३० वर्षापुर्वी ग्रामपंचायतीने येथे विहीर बांधकाम केले होते. गाव दोन भागात विभागले गेले आहे. मागील एका महिन्यापासून येथे नागरिकांना केवळ सकाळी पाणी देण्यात येते. विहिरीने तळ गाठला आहे. पाच वॉर्डात पाणी वितरीत करण्याच्या वेळा ग्रामपंचायतीने निश्चित केल्या आहेत. जून्या वस्तीत मात्र बराच वेळ पाणी देण्यात येते. येथे दूजाभाव करण्यात येत आहे. सायंकाळी येथे महिलांना विहिरीतून पाणी काढावे लागते. विहीरीत पाण्याचे स्त्रोत आहेत, परंतु ग्रामपंचायतीने विहीरीतील गाळ काढला नाही. त्यामुळे पाण्याचा येवा विहीरीत येत नाही. उड्डाणपूल बांधकाम करताना येथे मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळेही पाणी नागरिकांना मिळाले नाही. देव्हाडीवासीयांना दररोज ५० हजार लिटर पाणी लागते. ग्रामपंचायतीने येथे नियोजन न केल्याचे दिसून येते. ग्रामविकास अधिकारी दर्जाचे कर्मचारी येथे कार्यरत आहे. परंतु येथे नियोजनशुन्य कारभारामुळे नागरीक त्रस्त दिसत आहेत.(तालुका प्रतिनिधी)