शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 21:57 IST

शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक मार्गाचे बांधकाम उशिरा का होईना नाली बांधकामाचे रूपाने सुरू झाले आहे. परंतु त्यापुर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यावर चुरी घालण्यात आली होती. ही चुरी आता नागरिकांच्या जीवावर बेतते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचुरीवर पाणी मारण्याची आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक मार्गाचे बांधकाम उशिरा का होईना नाली बांधकामाचे रूपाने सुरू झाले आहे. परंतु त्यापुर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यावर चुरी घालण्यात आली होती. ही चुरी आता नागरिकांच्या जीवावर बेतते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. डिसेंबर महिन्यात या रस्त्याचे बांधकाम थांबल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून खोदलेल्या रस्त्यावर मुरूम व चुरी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्त्याकडे कुणीही ढुंकून पाहिले नाही. धुळ उडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.विशेषत: या मार्गावरील असलेली कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने व रहिवासी यांचा सर्वात मोठा फटका बसत आहे. चुरीमुळे उडणारी धुळ थेट श्वासाद्वारे फुफ्फुसात जात असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होईल याची शक्यता नाकारता येत नाही. या चुरीवर बांधकाम पूर्ण होईपर्यंत पाणी घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे.मोठ्या प्रमाणात उडणारी ही धुळ बांधकाम करणाºयांना व अधिकाºयांनाही दिसत नसावी काय, असा प्रश्न नागरिक विचारीत आहे.