शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट

By admin | Updated: April 17, 2015 00:38 IST

दुष्काळात तेरावा महिना अशी फार जुनी म्हण प्रसिद्ध आहे. ती म्हण आता सत्यात उतरु लागली आहे. दुष्काळी कामावर

अवकाळी पावसाचा फटका : मजुरांचे स्थलांतरण, रोहयोची कामे झाली बंदउसर्रा : दुष्काळात तेरावा महिना अशी फार जुनी म्हण प्रसिद्ध आहे. ती म्हण आता सत्यात उतरु लागली आहे. दुष्काळी कामावर अवकाळी पावसाचा फटका बसल्याने दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे.दुष्काळजन्य परिस्थितीत मागील महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. कधी ऊन्ह तर कधी पाऊस असे चक्र असून दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस आल्याने मजूर वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. दिवसभर घाम गाळणारा मजूर शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर राबराब राबतो. पण अवकाळी पावसाने मजुरांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. मोहाडी तालुक्यातील ग्राम उसर्रा येथे मागील काही दिवसांपासून शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नाला सरळीकरणाचे काम जोमात सुरु होते. सुखराम पुंडे ते बुधन ठाकरे यांच्या शेतापर्यंत सुमारे एक किलोमिटर अंतराचे हे नाला सरळीकरणाचे काम सुरु होते. यावर अंदाजे सहाशे मजूर कामावर होते. सन २०१५-१६ या नवीन आर्थिक वर्षातले हे पहिलेच काम होते.दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नाला तुडूंब भरून गेला व मजुरांची हातची रोजी गेली. गत सहा दिवसांपासून काम बंद असल्याने मजूरांनी नाराजी व्यक्त केली. बारा दिवसाचे मस्टर मागणी शासनाकडे केली होती व त्या कामाचे मस्टर सुद्धा निघाले आहेत. मात्र अवकाळी पावसाने मजुरांच्या आशेवर पाणी फेरले आहे. यावर्षी पाऊस अवेळी आल्याने शेतकऱ्यांचे हातचे धानपिक गेले. त्यातच कवडीमोल भावाने धानाची विक्री केल्याने बळीराजा दुखावला. मागील महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे, जवस, लाखोरी, गहू, उडीद सारखे पिके नष्ट झाली. कर्जबाजारी असलेल्या शेतकरी, शेतमजूरावर दु:खाचे डोंगर आहे. अशातच गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरु झाल्याने मजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या. या दरम्यान अवकाळी पाऊस आल्याने व बावनथडीच्या पात्रातून सरळ नाल्यात पाणी आल्याने नाला तुडूंब भरला आहे. त्यामुळे दुष्काळी कामावरही दुष्काळाचे सावट पसरले आहे. पोटाची खळगी भागविण्यासाठी काही मजूर शहराकडे स्थलांतरीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. यात काही मजूर बेलदारी कामासाठी तुमसरला तर काही नागपुरसारख्या शहरात कामाच्या शोधात निघाले आहेत. याशिवाय काही उपाय मजुरांसमोर दिसत नसल्याचे मजुरांनी सांगितले. (वार्ताहर)उसर्रा येथील नाला सरळीकरण कामासाठी मजुरांना काम मिळावा म्हणून आपण सातत्याने प्रयत्न केला पण अवकाळी पावसामुळे नाला तुडूंब भरला आहे. त्यामुळे सदर काम बंद करण्यात आले आहे. नाल्यातला पाणी कमी झाल्यास तात्काळ काम सुरु करण्यात येईल.- दीनदयाल पटलेग्रामरोजगार सेवक, उसर्रा