शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 2, 2016 00:29 IST

बळीराजाला वर्षभर शेतात सोबत करणाऱ्या बैलांच्या उपकाराचे देणे फेडणारा सण म्हणजे पोळा.

पावसाअभावी शेतकरी संकटात : ६३ प्रकल्पांत ३७ टक्के जलसाठा देवानंद नंदेश्वर भंडाराबळीराजाला वर्षभर शेतात सोबत करणाऱ्या बैलांच्या उपकाराचे देणे फेडणारा सण म्हणजे पोळा. पण मागील अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ९३ दिवसात केवळ ६७ टक्के पाऊस बरसला. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात केवळ ३७ टक्के जलसाठा असून सिंचनासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे गत तीन वर्षांप्रमाणे यावर्षीदेखील जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया आहे.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यत दुष्काळसदृश स्थिती होती. यंदा परिस्थिती बदलणार, अशी आशा होती. हवामान खात्यांचा अंदाज आणि सुरुवातीची दमदार पावल्यांनी एन्ट्री केल्याने पुढचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे होती. हा उत्साह पोळ्यानिमित्ताने दिसून येणार होता. पण पाऊस गायब झाला. धान पिकाला ऐन उमेदीच्या काळातच पाणी मिळाले नाही. अशातच २४ तासांपैकी ९ तास वीज मिळत असल्याने सिंचन सोय असलेले शेतकरीही या संकटापासून दूर नाहीत. याचा एकूणच परिणाम पोळ्याच्या बाजारपेठेवर दिसून येत आला. वाढत्या मजुऱ्या आणि ट्रॅक्टरच्या सोयीमुळे अलिकडे बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शंभरावर बैलजोड्या असलेल्या गावांमध्ये आता ही संख्या २५ वर येऊन ठेपली आहे. संख्याच कमी झाल्याने खरेदीही घटल्याचे सांगण्यात येत आहे.६३ प्रकल्पातील पाणीसाठ्यात केवळ ३७.६५ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३७.६५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ्यात १४ टक्के घट झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात बेटेकर बोथली प्रकल्पात १६ टक्के, चांदपूर मध्यम प्रकल्पात ३५, बघेडा ३०, सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा ३० टक्के आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३६.९८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ४७.४ टक्के आहे़ एकूण ६३ प्रकल्पात केवळ ४५.७९६ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ०१ सप्टेंबर २०१५ रोजी ६३ प्रकल्पात ६१.४०८ आणि ०१ सप्टेंबर २०१४ रोजी ७२.४५९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे.