शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 7, 2015 00:52 IST

पावसाळ्याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

शेतकरी हवालदिल : कोरड्या दुष्काळाने हिरावला पुरणपोळीचा घास राहुल भुतांगे तुमसरपावसाळ्याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आठवडाभरावर पोळा सण येवून ठेपला आहे. तरीही पाऊस बेपत्ताच असल्याने शेतकऱ्यांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. परिणामी शेतकऱ्याबरोबर दिवस-रात्र काळ््या मातीची (आईची) सेवा करत राब- राब राबणाऱ्या बैलांच्या व शेतकऱ्यांच्या मुखातील पुरणपोळीचा घास यंदांच्या दुष्काळाने हिरावून घेतल्याची खंत शेतकरी व्यक्त करित आहेत.तुमसर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत तसेच चिखलाजिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या गणेशपूर, पवनारखारी, लोभी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, सितासांवगी, खंडाळे, गुढरी, सक्करदरा, मोकोटोला, चिचोली, राजापूर, हिरापूर, हमेशा, घानोड, भोंडकी, गोबरवाही, हेटी धामनेवाडा या गावात भीषण कोरड्या दुष्काळाचे चित्र बघावयास मिळत आहे. या गावातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र पावसाने चांगलाच दगा दिल्याने गावातील तलाव तर सोडाच, परंतु जंगलव्याप्त रानतलावात बैलांना आंघोळ घालावी, इतकेही पाणी जमा झाले नाही. शेतकरी धान पिकाची शेती करणार तरी कसा? असा सवाल उपस्थित झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या हजारो हेक्टर जमिनी पडीकच ठेवल्याचे विदारक चित्र बघावयास मिळते. ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे मिळेल त्या साधनांने धान पिकाची शेती केली त्या शेतकऱ्यांच्या विहरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी शेतात घातलेला हजारो रुपयांचा रासायनिक खत दृष्टीस पडत असून मोठमोठ्या भेगा शेतात पडल्या आहेत. पिके करपायला लागले आहेत. चारा-पाण्याअभावी अर्धपोटी असलेली अशक्त झालेली जनावरे दावणीला हंबरडा फोडतांना पाहून शेतऱ्यांच्या डोळ््यात पाणी तरळू लागले आहे. हिरव्या शेताचे गत वैभव आठवत परिसरातील शेतकरी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन देत आहेत.शेतकऱ्यांच्या पोळासणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी नाही आणि बाजारासाठी जवळ पैसे नाही.महागाईने उच्चांक गाठल्याने तिखटमिठावरच पोळा सण साजरा करण्याची वेळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचा मित्र, आद्यदैवत बैलाना जिवंत ठेवण्याकरिता शेतकऱ्यांनी लावलेले मात्र पुर्णत: करपलेले पऱ्हे जनावरांसाठी वैरण बनविले आहेत.पोळा सण तोंडावर आला असून आता पावसाच्या आशा संपुर्णत: मावळत्या असून शासनानी या परिसरात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची व्यवस्था करुन शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळापासून दिलासा देण्याची गरज आहे.दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना शेतकऱ्यांचा वाली म्हणविणारे नेते भूमिगत झाले असले तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरिता आंदोलन उभारणार.- ठाकचंद मुंगुसमारे, रायुकां, तुमसर. शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने रोजगार हमीचे कामे परिसरात सुरु करुन उपाययोजना करावी.- दिलिप सोनवाने सरपंच, चिखला.