शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

धानाचा उतारा घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:22 IST

परिसरातील धान मळणी सुरू झाली आहे. अख्ख्या जिल्ह्यात धानाचा उतारा अत्यल्प येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्देबोनसची मागणी : लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरविण्याची गरज

आॅनलाईन लोकमतपालांदूर : परिसरातील धान मळणी सुरू झाली आहे. अख्ख्या जिल्ह्यात धानाचा उतारा अत्यल्प येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशी स्थिती असताना प्रशासनाने आणेवारी ६० टक्क्याच्यावर दाखविली आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. या कोठाराचे वैभव दिवसेंदिवस हटविले जात आहे. शासनाने झाल्याने धानाच्या धोरणात अपेक्षित बदल केलेले नाही. हतबल शेतकºयांचे कोण ऐकणार असा प्रश्न धान उत्पादकांना पडला आहे. ओरिसात धानाला २,९९० एवढा भाव मिळतो. आंध्रप्रदेश, गुजरात राज्यात धानाला प्रोत्साहन राशी दिले जाते. मग आम्हाला का नाही, असा प्रश्न चावळीवर चर्चीला जात आहे.महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतात बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्गाकरिता कोट्यवधींचे कर्ज घेत प्रत्येक भारतीयाला कर्जाचे भागीदार बनविले जाते. सुखसोई शहरात पुरविल्या जातात. मग ग्रामीणांना का नाही? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करीत सत्ता भोगण्याकरिता पुढारी अग्रस्थानी आहेत. पण त्याची दूरावस्था दूर करण्याकरिता पुढे का येत नाही हे अनाकलनीय आहे.भंडारा जिल्ह्यात हल्ली ६२ हमी धान केंद्रातून धान खरेदी सुरु आहे. पंधरा दिवस लोटले. मात्र निधी मिळाला नाही. धान विकले खरे पण पैसाच पदरात नसल्याने उधारीवरच सर्व सुरु आहे. महाकर्जमाफीच्या घोषणेला साडेचार महिन्याचा कालावधी लोटत असताना पहिल्या हिरव्या यादीत २२०८ नावे जाहीर करण्यात आले. परंतु आजपर्यंत प्रत्येक लाभ जिल्हा बँकेशी निगडीत ७६ शेतकऱ्यांनाच झाला आहे. साडेचार महिन्यानंतर या ७६ शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसापूर्वी ३०-२४ लाख रूपये जमा झाले आहे. पुन्हा ग्रीन यादी जाहीर होईपर्यंत उर्वरितांना प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चितच !एका एकरात १२ पोती एवढीच पीक झाल्याने वर्षभर उदरनिर्वाह व बँकेचे पिककर्ज कसे फेडावे या विवंचनेत आयुष्य खर्ची होत आहे. काय करावे सुचत नाही. शासनाच्या कुचकामी धोरणाने धान उत्पादकांची वाट लागली आहे. बोनस, सानुग्रह निधी, प्रोत्साहन निधी अंतर्गत शासनाला जेवढे शक्य असेल तेवढे करीत शेतकऱ्यांची हिंमत वाढवावी.-क्रिष्णा पराते, धान उत्पादक पालांदूर.