शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तलावांची दुरवस्था

By admin | Updated: December 23, 2015 00:49 IST

मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील तलावावर स्थानिक राजकारण्यानी व त्यांच्या सवर्मथकांनी कब्जा केल्याने तलावांचा बळी गेला आहे.

तलावांची दुरूस्ती केव्हा होणारमाजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीची गरजकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील तलावावर स्थानिक राजकारण्यानी व त्यांच्या सवर्मथकांनी कब्जा केल्याने तलावांचा बळी गेला आहे. तलाव माझा व त्यातील पाणी माझ्याच शेतीसाठी आहे. इतर मेले तरी चालेल, मी मात्र जगलो पाहिजे अशा ईर्षींच्या भावनेने वागतात. तलावातील पोटात अतिक्रमण वाढल्याने सिंचन क्षेत्र घटले आहे.राजकारणी किंवा शेतकरी अतिक्रमण व बेबंदशाही दूर करण्यासाठी पुढाकार घेताला दिसत नाही. मामा तलावाचे नुतनीकरण व राजकारणी किंवा शेतकरी अतिक्रमण व बेबंदशाही दूर करण्यासाठी दुर करण्यासाठी पुढाकार घेतांना दिसत नाही. मामा तलावाचे नूतनीकरण व खोलीकरण होण्याची गरज आहे. मोहाडी तालुक्यातील करडी पट्टा तलावांचा परिसर म्हणून ओळखला जातो. वैनगंगेच्या पूर्व काठावरील शेती सुपीक असून कृषीपंपाची सोय आहे. मात्र कोका जंगल टेकळ््यांच्या पायर्थ्यांशी असलेला मोठा परिसर तलावांच्या सिंचनावर अवलंबून आहे. वैनगंगा जवळून वाहत असली तरी या भागातील विहिरीत एक तास मोटार चालेल इतकेच पाणी नाही. संपूर्ण क्षेत्र सिंचनाने बकाल झाला आहे. फक्त खरीप पिकांपुरते पाणी साठविण्याची क्षमता येथील तलावात आहे. यावर्षी खरीप पिकांनाही पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तलावांच्या पायथ्याशी शेतीमध्ये दुष्काळाच्या मोठया भेगा दिसत आहेत. त्या भेगाप्रमाणे शेतकऱ्यांच काळीजही चिरले गेले. मात्र ते ना राजकारण्यांना दिसत आहे ना समाजकारण्यांना दिसत आहे ना समाजकारण्यांना शेतकरी आपल्या हक्कासाठी झटताना दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. करडी परिसरात देव्हाडा, मोहगाव, नवेगाव, जांभळापाणी, करडी, किसनपुर, लेंडेझरी, जांभोरा, केसलवाडा, पालोरा, खडकी, ढिवरवाडा, बोंडे, डोंगरदेव आदि मोहाडी तालुक्यातील गावात लहान मोठया तलावांची संख्या अधिक आहे.परिसराला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, लोहारा, चंद्रपूर माटोरा, नवेगाव आदि गावांतही तलावाची संख्या बरीच आहे. बऱ्याच तलावांच्या गेट नादुरुस्त आहेत. नवीन तयार झालेल्या गेट स्थानीक राजकारणी फसगत होते ती शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून परिसरातील तलावांच्या कामासाठी एकाच इंजिनीयरची नियुक्ती असल्याने त्यांची बदली होत नसल्याने सुध्दा त्यांचा दरारा समजण्यासारखा आहे. तलावांच्या पाळी कमकुवत आहेत. तलाव गाळाने भरलेले असल्याने सपाट झाली आहेत. गाळांचा उपसा करणे गरजेचे झाले आहे. त्यातही यंत्राच्या सहाय्याने उपसा, खोलीकरण होण्याची आवश्यकता आहे.रोहयो कामाच्या माध्यमातून तलाव खोलीकरण्याची, गाळ उपसण्याची कामे हाती घेण्यात येत असली तरी आर्थिक तरतुदी अगदीच नगण्य असते. त्यातही इतर अकुशल कामांसाठी निधी दिली जात असल्याने अंदाजपत्रके फुगलेली दिसतात. सर्वतलावामध्ये कमीजास्त प्रमाणात अतिक्रमण शेतकऱ्यांनी केले आहे. बऱ्याचबेळी अतिक्रमण हटविण्याच्या वावडया उठतात. परंतु पाण्यावरील तरंगाप्रमाणे विरुनही जातात. प्रश्न मात्र कायम राहतो. काही तलावात तर अर्धे अधिक अतिक्रमण झाले आहे. गावकरी ग्रामसभामधून ठराव घेतात. परंतु राजकारणी राजकीय सर्मथकाच्या नाराजीमुळे आपले नुकसान होणार म्हणून त्या ठरावावर कार्यवाही करीत नाही. अतिक्रमणामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सिंचनाच्या अपुऱ्या क्षमतेमुळे पिकांवर परिणाम होऊ न उत्पन्नात घट झाली. यावर्षी तलावाचे पाणी पुरेपूर मिळाले नाही. तलावांवर दादागिरी केल्याने कोरडया दुष्काळाचा मारा शेतकऱ्यांना बसला. राजकीय उदासीनतेमुळे अतिक्रमणे जैसे थे असून अधिकारीही त्याकडे लक्ष देत नाही. खऱ्या अर्थाने तलावांचा बळी गेला आहे. (वार्ताहर)