शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
3
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
5
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
6
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
7
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
8
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
9
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
10
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
11
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
12
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
13
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
14
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
15
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
16
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
17
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
18
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
19
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
20
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तलावांची दुरवस्था

By admin | Updated: December 23, 2015 00:49 IST

मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील तलावावर स्थानिक राजकारण्यानी व त्यांच्या सवर्मथकांनी कब्जा केल्याने तलावांचा बळी गेला आहे.

तलावांची दुरूस्ती केव्हा होणारमाजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीची गरजकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील तलावावर स्थानिक राजकारण्यानी व त्यांच्या सवर्मथकांनी कब्जा केल्याने तलावांचा बळी गेला आहे. तलाव माझा व त्यातील पाणी माझ्याच शेतीसाठी आहे. इतर मेले तरी चालेल, मी मात्र जगलो पाहिजे अशा ईर्षींच्या भावनेने वागतात. तलावातील पोटात अतिक्रमण वाढल्याने सिंचन क्षेत्र घटले आहे.राजकारणी किंवा शेतकरी अतिक्रमण व बेबंदशाही दूर करण्यासाठी पुढाकार घेताला दिसत नाही. मामा तलावाचे नुतनीकरण व राजकारणी किंवा शेतकरी अतिक्रमण व बेबंदशाही दूर करण्यासाठी दुर करण्यासाठी पुढाकार घेतांना दिसत नाही. मामा तलावाचे नूतनीकरण व खोलीकरण होण्याची गरज आहे. मोहाडी तालुक्यातील करडी पट्टा तलावांचा परिसर म्हणून ओळखला जातो. वैनगंगेच्या पूर्व काठावरील शेती सुपीक असून कृषीपंपाची सोय आहे. मात्र कोका जंगल टेकळ््यांच्या पायर्थ्यांशी असलेला मोठा परिसर तलावांच्या सिंचनावर अवलंबून आहे. वैनगंगा जवळून वाहत असली तरी या भागातील विहिरीत एक तास मोटार चालेल इतकेच पाणी नाही. संपूर्ण क्षेत्र सिंचनाने बकाल झाला आहे. फक्त खरीप पिकांपुरते पाणी साठविण्याची क्षमता येथील तलावात आहे. यावर्षी खरीप पिकांनाही पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तलावांच्या पायथ्याशी शेतीमध्ये दुष्काळाच्या मोठया भेगा दिसत आहेत. त्या भेगाप्रमाणे शेतकऱ्यांच काळीजही चिरले गेले. मात्र ते ना राजकारण्यांना दिसत आहे ना समाजकारण्यांना दिसत आहे ना समाजकारण्यांना शेतकरी आपल्या हक्कासाठी झटताना दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. करडी परिसरात देव्हाडा, मोहगाव, नवेगाव, जांभळापाणी, करडी, किसनपुर, लेंडेझरी, जांभोरा, केसलवाडा, पालोरा, खडकी, ढिवरवाडा, बोंडे, डोंगरदेव आदि मोहाडी तालुक्यातील गावात लहान मोठया तलावांची संख्या अधिक आहे.परिसराला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, लोहारा, चंद्रपूर माटोरा, नवेगाव आदि गावांतही तलावाची संख्या बरीच आहे. बऱ्याच तलावांच्या गेट नादुरुस्त आहेत. नवीन तयार झालेल्या गेट स्थानीक राजकारणी फसगत होते ती शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून परिसरातील तलावांच्या कामासाठी एकाच इंजिनीयरची नियुक्ती असल्याने त्यांची बदली होत नसल्याने सुध्दा त्यांचा दरारा समजण्यासारखा आहे. तलावांच्या पाळी कमकुवत आहेत. तलाव गाळाने भरलेले असल्याने सपाट झाली आहेत. गाळांचा उपसा करणे गरजेचे झाले आहे. त्यातही यंत्राच्या सहाय्याने उपसा, खोलीकरण होण्याची आवश्यकता आहे.रोहयो कामाच्या माध्यमातून तलाव खोलीकरण्याची, गाळ उपसण्याची कामे हाती घेण्यात येत असली तरी आर्थिक तरतुदी अगदीच नगण्य असते. त्यातही इतर अकुशल कामांसाठी निधी दिली जात असल्याने अंदाजपत्रके फुगलेली दिसतात. सर्वतलावामध्ये कमीजास्त प्रमाणात अतिक्रमण शेतकऱ्यांनी केले आहे. बऱ्याचबेळी अतिक्रमण हटविण्याच्या वावडया उठतात. परंतु पाण्यावरील तरंगाप्रमाणे विरुनही जातात. प्रश्न मात्र कायम राहतो. काही तलावात तर अर्धे अधिक अतिक्रमण झाले आहे. गावकरी ग्रामसभामधून ठराव घेतात. परंतु राजकारणी राजकीय सर्मथकाच्या नाराजीमुळे आपले नुकसान होणार म्हणून त्या ठरावावर कार्यवाही करीत नाही. अतिक्रमणामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सिंचनाच्या अपुऱ्या क्षमतेमुळे पिकांवर परिणाम होऊ न उत्पन्नात घट झाली. यावर्षी तलावाचे पाणी पुरेपूर मिळाले नाही. तलावांवर दादागिरी केल्याने कोरडया दुष्काळाचा मारा शेतकऱ्यांना बसला. राजकीय उदासीनतेमुळे अतिक्रमणे जैसे थे असून अधिकारीही त्याकडे लक्ष देत नाही. खऱ्या अर्थाने तलावांचा बळी गेला आहे. (वार्ताहर)