शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संचारबंदीमुळे रोजी गेली मात्र शिवभोजन थाळीचा मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ...

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी संचारबंदीची घोषणा करतानाच राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही यासाठी शिवभोजन केंद्रातून मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना पंधराशे रुपये मानधन देऊन मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.

बॉक्स

एक हजार जणांना दररोज मिळतोय शिवभोजनाचा लाभ

१) भंडारा जिल्ह्यात १३ शिव भोजन केंद्रांतर्गत अनेकांना लाभ मिळत आहे. भंडारा शहरात चार शिवभोजन केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषद परिसरात माविमकडे असणारे एक केंद्र तर दुसरे महसूल कँटींनचे, तिसरे रुग्णालय परिसरात तर चौथे वरठी रोडवर अशी भंडारा शहरात चार ठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातील नागरिकांना या केंद्राचा आधार घेता येतो.

२) शहरी भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना शासनाकडून ४५ रुपयाचे अनुदान देण्यात येते तर ग्रामीण भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना ३५ रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यामुळे गोरगरिबांना फक्त पाच रुपयात जेवण दिले जाते. आता तर मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

बॉक्स

३८० ग्रॅमची शिवभोजनची थाळी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून गोरगरिबांना शिवभोजन केंद्रांतून ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम वरण, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी असे एकूण 380 ग्रॅम वजनाची थाळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याचा लाभ लॉकडॉऊन कालखंडातही अनेकांना झाला तर आता संचारबंदीच्या काळातही अनेक गरजू शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.

कोट

१ शिवभोजन थाळीचा आम्हाला संकटाच्या काळात चांगला आधार मिळत आहे.पाच रुपयात जेवणाची थाळी आम्हाला मिळात आहे. यात दोन चपात्या, भात, वरण, भाजी असे पोटभर आणि चांगले जेवण मिळते, याचे समाधान आहे.

मोरेश्वर गजभिये, विद्यार्थी

कोट

२ गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्याचा सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. ज्यांचे कुणीही नाही, त्यांचे स्वतःचे घर नाही अशांना शिवभोजन थाळी लाखमोलाची ठरत आहे. मी अनेकदा शिवभोजनाचा आनंद घेतला आहे.

सुरेंद्र मेश्राम, भंडारा

कोट

३ दोन चपाती, वरण, भाजी, भात इतके पुरेसे जेवण शिवभोजन थाळीतून मिळते. मी गेल्या काही महिन्यापासून नियमित शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. शासनाने भंडारा शहरात शिव भोजन केंद्राची संख्या वाढवावी,अशी मागणी आहे.

अजय भुतांगे, लाखांदूर