शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

संचारबंदीमुळे रोजी गेली मात्र शिवभोजन थाळीचा मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ...

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी संचारबंदीची घोषणा करतानाच राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही यासाठी शिवभोजन केंद्रातून मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना पंधराशे रुपये मानधन देऊन मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.

बॉक्स

एक हजार जणांना दररोज मिळतोय शिवभोजनाचा लाभ

१) भंडारा जिल्ह्यात १३ शिव भोजन केंद्रांतर्गत अनेकांना लाभ मिळत आहे. भंडारा शहरात चार शिवभोजन केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषद परिसरात माविमकडे असणारे एक केंद्र तर दुसरे महसूल कँटींनचे, तिसरे रुग्णालय परिसरात तर चौथे वरठी रोडवर अशी भंडारा शहरात चार ठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातील नागरिकांना या केंद्राचा आधार घेता येतो.

२) शहरी भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना शासनाकडून ४५ रुपयाचे अनुदान देण्यात येते तर ग्रामीण भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना ३५ रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यामुळे गोरगरिबांना फक्त पाच रुपयात जेवण दिले जाते. आता तर मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

बॉक्स

३८० ग्रॅमची शिवभोजनची थाळी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून गोरगरिबांना शिवभोजन केंद्रांतून ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम वरण, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी असे एकूण 380 ग्रॅम वजनाची थाळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याचा लाभ लॉकडॉऊन कालखंडातही अनेकांना झाला तर आता संचारबंदीच्या काळातही अनेक गरजू शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.

कोट

१ शिवभोजन थाळीचा आम्हाला संकटाच्या काळात चांगला आधार मिळत आहे.पाच रुपयात जेवणाची थाळी आम्हाला मिळात आहे. यात दोन चपात्या, भात, वरण, भाजी असे पोटभर आणि चांगले जेवण मिळते, याचे समाधान आहे.

मोरेश्वर गजभिये, विद्यार्थी

कोट

२ गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्याचा सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. ज्यांचे कुणीही नाही, त्यांचे स्वतःचे घर नाही अशांना शिवभोजन थाळी लाखमोलाची ठरत आहे. मी अनेकदा शिवभोजनाचा आनंद घेतला आहे.

सुरेंद्र मेश्राम, भंडारा

कोट

३ दोन चपाती, वरण, भाजी, भात इतके पुरेसे जेवण शिवभोजन थाळीतून मिळते. मी गेल्या काही महिन्यापासून नियमित शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. शासनाने भंडारा शहरात शिव भोजन केंद्राची संख्या वाढवावी,अशी मागणी आहे.

अजय भुतांगे, लाखांदूर