शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

संचारबंदीमुळे रोजी गेली मात्र शिवभोजन थाळीचा मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ...

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी संचारबंदीची घोषणा करतानाच राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही यासाठी शिवभोजन केंद्रातून मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना पंधराशे रुपये मानधन देऊन मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.

बॉक्स

एक हजार जणांना दररोज मिळतोय शिवभोजनाचा लाभ

१) भंडारा जिल्ह्यात १३ शिव भोजन केंद्रांतर्गत अनेकांना लाभ मिळत आहे. भंडारा शहरात चार शिवभोजन केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषद परिसरात माविमकडे असणारे एक केंद्र तर दुसरे महसूल कँटींनचे, तिसरे रुग्णालय परिसरात तर चौथे वरठी रोडवर अशी भंडारा शहरात चार ठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातील नागरिकांना या केंद्राचा आधार घेता येतो.

२) शहरी भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना शासनाकडून ४५ रुपयाचे अनुदान देण्यात येते तर ग्रामीण भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना ३५ रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यामुळे गोरगरिबांना फक्त पाच रुपयात जेवण दिले जाते. आता तर मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

बॉक्स

३८० ग्रॅमची शिवभोजनची थाळी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून गोरगरिबांना शिवभोजन केंद्रांतून ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम वरण, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी असे एकूण 380 ग्रॅम वजनाची थाळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याचा लाभ लॉकडॉऊन कालखंडातही अनेकांना झाला तर आता संचारबंदीच्या काळातही अनेक गरजू शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.

कोट

१ शिवभोजन थाळीचा आम्हाला संकटाच्या काळात चांगला आधार मिळत आहे.पाच रुपयात जेवणाची थाळी आम्हाला मिळात आहे. यात दोन चपात्या, भात, वरण, भाजी असे पोटभर आणि चांगले जेवण मिळते, याचे समाधान आहे.

मोरेश्वर गजभिये, विद्यार्थी

कोट

२ गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्याचा सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. ज्यांचे कुणीही नाही, त्यांचे स्वतःचे घर नाही अशांना शिवभोजन थाळी लाखमोलाची ठरत आहे. मी अनेकदा शिवभोजनाचा आनंद घेतला आहे.

सुरेंद्र मेश्राम, भंडारा

कोट

३ दोन चपाती, वरण, भाजी, भात इतके पुरेसे जेवण शिवभोजन थाळीतून मिळते. मी गेल्या काही महिन्यापासून नियमित शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. शासनाने भंडारा शहरात शिव भोजन केंद्राची संख्या वाढवावी,अशी मागणी आहे.

अजय भुतांगे, लाखांदूर