शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

संचारबंदीत रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, खात रोडवरील खांब तलावाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रत्येकाची तपासणी सुरू केली. खांब तलाव येथे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस करूनच शहरात सोडले जात होते.  पोलिसांचे वाहनही शहरभर गस्त घालताना दिसत होते. यामुळे शहरातील मोठा बाजार, मेन लाईन, बसस्थानक परिसर, त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, खात रोड सर्व भागातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.

ठळक मुद्देठिकठिकाणी तपासणी : नगर परिषदेच्या पथकाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीची भंडारा शहरासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी केली जात असून गुरुवारी शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. सकाळी रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतर संपूर्ण शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्यागत दिसत होते. दरम्यान नगर परिषदेच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली तर अनेक वॉर्डात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजतापासून संचारबंदी घोषित झाली. गुरुवारी सकाळी जीवनावश्यक वस्तुूची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. मात्र सकाळच्या वेळी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत होते. अशांना पोलिस पथकाने सज्जड दम देऊन घरी पाठविले. तसेच शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, खात रोडवरील खांब तलावाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रत्येकाची तपासणी सुरू केली. खांब तलाव येथे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस करूनच शहरात सोडले जात होते. पोलिसांचे वाहनही शहरभर गस्त घालताना दिसत होते. यामुळे शहरातील मोठा बाजार, मेन लाईन, बसस्थानक परिसर, त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, खात रोड सर्व भागातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांची तेवढी वर्दळ सुरू होती. नगरपरिषद आणि स्थानिक पोलिसांच्यावतीने शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने तेवढी सुरू होती. शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनीही या संचारबंदीला  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरी भागात कडकडीत बंद असले तरी ग्रामीण भागात मात्र त्याचा फारसा परिणाम दिसत नव्हता. ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे.

भाजी बाजाराची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ भंडारा शहरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने नगर परिषदेने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहरात भरत असलेल्या भाजी बाजारासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. भाजी बाजाराची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार आहे. शहरातील बीटीबी बाजारासमोरील छोटी दुकाने, गांधी चौक, महिला समाज शाळा ते शास्त्री चौक या परिसरातील भाजीपाला दुकाने, फळ दुकाने, बजा बाजार, गुजरी व शहरातील सर्व रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रीची दुकाने तसेच मिस्कीन टँक ते राजीव गांधी चौक परिसरातील दुकानांसाठी दसरा मैदान,  रेल्वे मैदान, राजीव गांधी चौकातील गणेश शाळा आणि मुस्लिम लायब्ररी चौकातील तुरस्कर गार्डन येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी या ठिकाणी दुकाने लावावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विनोज जाधव यांनी सांगितले.

जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद  जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, तुमसर या तालुका ठिकाणासह ग्रामीण भागातही संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी होती. मात्र ग्रामीण भागात हवा तसा प्रतिसाद या संचारबंदीला मिळत नसल्याचे दिसत होते.

बाहेर निघण्यासाठी अनंत कारणे संचारबंदी काळातही बाहेर निघण्यासाठी अनेकांची धडपड दिसत होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली तरी काही जण शहरात फेरफटका मारताना दिसत होते. पोलिसांनी अशांना थांबविले तर कारणांचा पाढाच वाचला जात होता. कोणी किराणा आणण्याचे कारण तर कुणी भाजीपाला अशी कारणे सांगून शहरात फिरताना दिसत होते. विशेष म्हणजे कालपर्यंत संचारबंदी नसताना आज अनेकांच्या घरातील साहित्य संपले कसे असा सवाल पोलिसांना पडला होता.  ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीत बांधकामासाठी बाहेरून मजूर आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बांधकामावर असलेल्या मजुरांची निवासी व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करण्याचे आदेश आहे. त्यानुसार भंडारा नगर परिषदेच्या पथकाने शहरातील सुमारे ३० घरांचे बांधकाम थांबविले आहे. याउपरही घराचे बांधकाम कुणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषदेने दिले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या