शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्ह्यातील तीन तालुक्यात होणार दुष्काळाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:01 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर खरिपाचा दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.

ठळक मुद्देमोहाडी, लाखनी, पवनी : ३८ गावांची रँडम पद्धतीने निवड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर खरिपाचा दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे. अनेक गावातील धानपीक पिवळे पडले असून करपत आहे. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. २०१८ च्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार पवनी, मोहाडी व लाखनी या तीन तालुक्यांमध्ये ट्रिगर दोन लागू झाला आहे.ट्रिगर एक व दोन तालुके निश्चित करण्यासाठी शासनाने एमआरएसएसी च्या सहाय्याने मुल्यांकन करण्यासाठी महामदत नावाची संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्याचे अहवाल शासनाला पाठविले जाणार आहे.शासनाने दुष्काळ घोषित करण्यासाठी ७ आॅक्टोबर २०१७ च्या निकषाप्रमाणे नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरीपाचा दुष्काळ ३१ आॅक्टोबरला जाहीर होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील सरासरीच्या ७५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे, अशा तीन तालुक्यांची निवड ट्रिगर दोन साठी झाली आहे. आता या तालुक्यातील गावांची निवड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना दिले आहेत. मोहाडी आणि लाखनी तालुक्यातील प्रत्येकी ११ तर पवनी तालुक्यातील १६ गावांची रँडम पद्धतीने निवड करण्यात आली आहे. या गावातील प्रमुख पिकांचे सर्वेक्षण गटनंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे.या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. या गटातील पीक, शेतकºयांची माहिती, पीकांची सद्यस्थिती, पीकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाईलवर अपलोड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी संबंधितांना याबाबत सूचना दिल्या असून दैनंदिन प्रगतीचा अहवाल दररोज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे निर्देश पाठविण्यात आले आहे.खरीप हंगामातील पीकांची कापणी करण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर आॅक्टोबर अखेर शासन खरीपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे. आता कोणत्या गावांना शासन दुष्काळग्रस्त घोषीत करते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याने संपूर्ण जिल्हा घोषीत करावा अशी मागणी आहे.या गावांची झाली सर्वेक्षणासाठी निवडच्जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पवनी, मोहाडी, लाखनी या तीन तालुक्यातील ३८ गावांची निवड ट्रिगर दोनच्या सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात मोहाडी तालुक्यातील पांजरा, हिवरा, बेटाळा, बच्छेरा, करडी, आंधळगाव, हरदोली, टाकळी, कांद्री, सालई बुज., निलज खुर्द, लाखनी तालुक्यातील आलेसूर, केसलवाडा, खैरी, भूगाव, बंधरझरी, मानेगाव, खैरी, खुर्शीपार, मलकाझरी, डोंगरगाव, शिवणी तर पवनी तालुक्यातील राजकोटा, मांगली चौरास, किसनापूर, इटगाव, सोनेगाव, कोसरा, रेवानी, पवना खुर्द, सावरगाव रनाळा (अन्नपुर्णा), प्रधान, मुरमाडी, लवारी, चिचबोडी, भिकारमिन्सी, आंबाडी या गावांचा समावेश आहे.