शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

जिल्ह्यातील तीन तालुक्यात होणार दुष्काळाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:01 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर खरिपाचा दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.

ठळक मुद्देमोहाडी, लाखनी, पवनी : ३८ गावांची रँडम पद्धतीने निवड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर खरिपाचा दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे. अनेक गावातील धानपीक पिवळे पडले असून करपत आहे. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. २०१८ च्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार पवनी, मोहाडी व लाखनी या तीन तालुक्यांमध्ये ट्रिगर दोन लागू झाला आहे.ट्रिगर एक व दोन तालुके निश्चित करण्यासाठी शासनाने एमआरएसएसी च्या सहाय्याने मुल्यांकन करण्यासाठी महामदत नावाची संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्याचे अहवाल शासनाला पाठविले जाणार आहे.शासनाने दुष्काळ घोषित करण्यासाठी ७ आॅक्टोबर २०१७ च्या निकषाप्रमाणे नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरीपाचा दुष्काळ ३१ आॅक्टोबरला जाहीर होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील सरासरीच्या ७५ टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे, अशा तीन तालुक्यांची निवड ट्रिगर दोन साठी झाली आहे. आता या तालुक्यातील गावांची निवड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना दिले आहेत. मोहाडी आणि लाखनी तालुक्यातील प्रत्येकी ११ तर पवनी तालुक्यातील १६ गावांची रँडम पद्धतीने निवड करण्यात आली आहे. या गावातील प्रमुख पिकांचे सर्वेक्षण गटनंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे.या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. या गटातील पीक, शेतकºयांची माहिती, पीकांची सद्यस्थिती, पीकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाईलवर अपलोड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी संबंधितांना याबाबत सूचना दिल्या असून दैनंदिन प्रगतीचा अहवाल दररोज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे निर्देश पाठविण्यात आले आहे.खरीप हंगामातील पीकांची कापणी करण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर आॅक्टोबर अखेर शासन खरीपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे. आता कोणत्या गावांना शासन दुष्काळग्रस्त घोषीत करते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याने संपूर्ण जिल्हा घोषीत करावा अशी मागणी आहे.या गावांची झाली सर्वेक्षणासाठी निवडच्जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पवनी, मोहाडी, लाखनी या तीन तालुक्यातील ३८ गावांची निवड ट्रिगर दोनच्या सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात मोहाडी तालुक्यातील पांजरा, हिवरा, बेटाळा, बच्छेरा, करडी, आंधळगाव, हरदोली, टाकळी, कांद्री, सालई बुज., निलज खुर्द, लाखनी तालुक्यातील आलेसूर, केसलवाडा, खैरी, भूगाव, बंधरझरी, मानेगाव, खैरी, खुर्शीपार, मलकाझरी, डोंगरगाव, शिवणी तर पवनी तालुक्यातील राजकोटा, मांगली चौरास, किसनापूर, इटगाव, सोनेगाव, कोसरा, रेवानी, पवना खुर्द, सावरगाव रनाळा (अन्नपुर्णा), प्रधान, मुरमाडी, लवारी, चिचबोडी, भिकारमिन्सी, आंबाडी या गावांचा समावेश आहे.