शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

करडी परिसरात दुष्काळसदृश स्थिती

By admin | Updated: December 25, 2015 01:47 IST

शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे.

शेतकरी संकटात : कमी पैसेवारी घोषित करण्याची मागणीकरडी (पालोरा) : शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे. अंतिम आणेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबर रोजी जाहिर होणार आहे. करडी क्षेत्रात यावर्षी किडीच्या व रोगांच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. करडी परिसरातील गावे कमी आणेवारीच्या क्षेत्रात समाविष्ट करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासनानेही आणेवारी काढण्याच्या पध्दतीत बदल केला आहे. अंतिम आणेवारी घोषित करण्याअगोदर प्रथम नजर आणेवारी काढली जाते. त्यानंतर दुसरी सुधारित जाहिर केली जाते. त्यानंतर तिसरी व अंतिम आणेवारी घोषित केली जाते. मागील वर्षापर्यंत अंतिम आणेवारी जाहिर करण्याचा १५ जानेवारी असायचा मात्र त्यात शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बदल करण्यात आला आहे. आता ३१ डिसेंबर रोजी अंतीम आणेवारी जाहिर करण्याचा निर्णय झालेला आहे. यावर्षी धानाचे मुख्य पिक नजरेला भरणारे दिसत होते. चांगले उत्पादन मिळण्याची आशा व्यक्त होत होती. धानाला, तिळ व तुरिला किड व इतर रोगांनी मोठ्या प्रमाणात ग्रासले. होत्याचे नव्हते झाले. पिक कापणी व मळणी नंतर प्रत्यक्ष पिकाचा उतारा अतिशय कमी निघाला. एकरी तिन ते चार पोते धानाचे उत्पादन हाती मिळाले. एकरी २० ते २२ हजाराचा खर्च झाला असतांना उत्पादन मात्र २ ते ३ हजाराचे मिळाले. काही ठिकाणी तो पाच ते दहा पोत्यांचा निघाला. करडी परिसरात कमी नव्हे ऐवढे कमी उत्पादन शेतकऱ्यांना झाले. लागलेला उत्पादन खर्चही यातून निघालेला नाही. घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत शेतकरी आहेत. अंतिम आणेवारीत करडी परिसराचा समावेश करावा. परिसर दुष्काळग्रसत घोषित करावे या मागण्याचे निवेदन मोहाडी तहसिलदारांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)