शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात दुष्काळसदृश स्थिती

By admin | Updated: December 25, 2015 01:47 IST

शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे.

शेतकरी संकटात : कमी पैसेवारी घोषित करण्याची मागणीकरडी (पालोरा) : शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे. अंतिम आणेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबर रोजी जाहिर होणार आहे. करडी क्षेत्रात यावर्षी किडीच्या व रोगांच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. करडी परिसरातील गावे कमी आणेवारीच्या क्षेत्रात समाविष्ट करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासनानेही आणेवारी काढण्याच्या पध्दतीत बदल केला आहे. अंतिम आणेवारी घोषित करण्याअगोदर प्रथम नजर आणेवारी काढली जाते. त्यानंतर दुसरी सुधारित जाहिर केली जाते. त्यानंतर तिसरी व अंतिम आणेवारी घोषित केली जाते. मागील वर्षापर्यंत अंतिम आणेवारी जाहिर करण्याचा १५ जानेवारी असायचा मात्र त्यात शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बदल करण्यात आला आहे. आता ३१ डिसेंबर रोजी अंतीम आणेवारी जाहिर करण्याचा निर्णय झालेला आहे. यावर्षी धानाचे मुख्य पिक नजरेला भरणारे दिसत होते. चांगले उत्पादन मिळण्याची आशा व्यक्त होत होती. धानाला, तिळ व तुरिला किड व इतर रोगांनी मोठ्या प्रमाणात ग्रासले. होत्याचे नव्हते झाले. पिक कापणी व मळणी नंतर प्रत्यक्ष पिकाचा उतारा अतिशय कमी निघाला. एकरी तिन ते चार पोते धानाचे उत्पादन हाती मिळाले. एकरी २० ते २२ हजाराचा खर्च झाला असतांना उत्पादन मात्र २ ते ३ हजाराचे मिळाले. काही ठिकाणी तो पाच ते दहा पोत्यांचा निघाला. करडी परिसरात कमी नव्हे ऐवढे कमी उत्पादन शेतकऱ्यांना झाले. लागलेला उत्पादन खर्चही यातून निघालेला नाही. घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत शेतकरी आहेत. अंतिम आणेवारीत करडी परिसराचा समावेश करावा. परिसर दुष्काळग्रसत घोषित करावे या मागण्याचे निवेदन मोहाडी तहसिलदारांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)