शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

दुष्काळी मदत पोहोचलीच नाही

By admin | Updated: May 3, 2016 00:39 IST

दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली;

पावसाळा तोंडावर : बळीराजा हवालदिलदेवानंद नंदेश्वर भंडारादुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अद्याप मदत निधी उपलब्ध झाला नाही. पावसाळा तोंडावर आला असला तरी दुष्काळी मदतीचा पत्ता नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ३७१ गावातील शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीनुसार ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील गावांमध्ये गत २३ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ३७१ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील ३७१ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत निधी अद्याप उपलब्ध झाला नाही. हवामान वेधशाळांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे. त्यानुसार पावसाळा महिनाभरावर आला असून, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी, शासनाकडून दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत पिकांचे उत्पादन बुडाले. नापिकीमुळे जवळ पैसा नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून, येत्या खरीप हंगामात पीक पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यानुषंगाने खरीप पेरणीपूर्वी शासनाकडून दुष्काळी मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे; परंतु पावसाळा महिनाभरावर आला असताना, शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याच्या स्थितीत खरीप पेरणीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.