शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
3
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
4
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
5
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
6
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
7
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
8
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
9
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
10
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
11
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
12
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
13
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
14
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
15
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
16
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
17
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
18
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
19
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
20
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
Daily Top 2Weekly Top 5

धुळीच्या लोटाने आजार बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:57 IST

शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे.

ठळक मुद्देसावधान! काम सुरु आहे : एकेरी वाहतूक ठरत आहे त्रासदायक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्ता बांधाकामाचा फटका शहरवासीयांना बसत असून त्यांच्या आरोग्यासाठी मारक ठरत आहे.दररोज सकाळी, संध्याकाळी ६ वाजतानंतर रस्त्यावर वाहनांची दररोज कोंढी होते. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजात शहरवासीयांना दररोज ये-जा करताना प्रवाशांना धुळीमुळे नाकीनऊ येत आहे. रस्त्यावरून एस. टी, ट्रक यासारखी अवजड वाहने गेली केली की, वाहनामागून प्रचंड धुळीचे लोळ उडत असल्याने ही धुळ नागरिकांच्या नाका-तोंडात जात आहे. दुचाकी चालकांना तर वाहन चालविणेही धोकादायक ठरत आहे.वाहन धारकांना रस्त्यावरून ये-जा करणे दिवसेंदिवस त्रासदायक होत असून चौकात खोदलेल्या खड्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाला अंदाजच येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.एकाच वेळी दोन दोन वाहने जाण्याइतपत रस्ता रुंद नसल्याने वाहनधारकांकडून धोकादायक पद्धतीने वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास अपघाताला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. राजीव गांधी चौक ते खात रोड या रस्त्याचीही हीच अवस्था असल्याने या रस्त्यावरील वाहतूकही जीवघेणी ठरते आहे. प्रशासनाकडून रस्ते कामाला उशिर होत असल्याने शहरवासीयांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. एकाच वेळी अनेक वाहने रस्त्यावरून ये-जा करणे शक्य होत नसल्याने यापुर्वीही रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहे. याच भागात अनेक दवाखाने, शाळा, महत्वाचे कार्यालये आहेत, हे मात्र विशेष.पाणीटंचाईचा परिणामसिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असताना या भागात धुळीचा त्रास होवू नये म्हणून नागरिकांकडून सकाळी, संध्याकाळी रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी होत असतानाही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच पायी चालणाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे विद्यार्थी, आबालवृद्ध व रस्त्यावरून चालणाºया पादचाऱ्यांना धुळीमुळे चालणे असह्य होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक