शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

धुळीच्या लोटाने आजार बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:57 IST

शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे.

ठळक मुद्देसावधान! काम सुरु आहे : एकेरी वाहतूक ठरत आहे त्रासदायक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्ता बांधाकामाचा फटका शहरवासीयांना बसत असून त्यांच्या आरोग्यासाठी मारक ठरत आहे.दररोज सकाळी, संध्याकाळी ६ वाजतानंतर रस्त्यावर वाहनांची दररोज कोंढी होते. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजात शहरवासीयांना दररोज ये-जा करताना प्रवाशांना धुळीमुळे नाकीनऊ येत आहे. रस्त्यावरून एस. टी, ट्रक यासारखी अवजड वाहने गेली केली की, वाहनामागून प्रचंड धुळीचे लोळ उडत असल्याने ही धुळ नागरिकांच्या नाका-तोंडात जात आहे. दुचाकी चालकांना तर वाहन चालविणेही धोकादायक ठरत आहे.वाहन धारकांना रस्त्यावरून ये-जा करणे दिवसेंदिवस त्रासदायक होत असून चौकात खोदलेल्या खड्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाला अंदाजच येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.एकाच वेळी दोन दोन वाहने जाण्याइतपत रस्ता रुंद नसल्याने वाहनधारकांकडून धोकादायक पद्धतीने वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास अपघाताला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. राजीव गांधी चौक ते खात रोड या रस्त्याचीही हीच अवस्था असल्याने या रस्त्यावरील वाहतूकही जीवघेणी ठरते आहे. प्रशासनाकडून रस्ते कामाला उशिर होत असल्याने शहरवासीयांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. एकाच वेळी अनेक वाहने रस्त्यावरून ये-जा करणे शक्य होत नसल्याने यापुर्वीही रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहे. याच भागात अनेक दवाखाने, शाळा, महत्वाचे कार्यालये आहेत, हे मात्र विशेष.पाणीटंचाईचा परिणामसिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असताना या भागात धुळीचा त्रास होवू नये म्हणून नागरिकांकडून सकाळी, संध्याकाळी रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी होत असतानाही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच पायी चालणाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे विद्यार्थी, आबालवृद्ध व रस्त्यावरून चालणाºया पादचाऱ्यांना धुळीमुळे चालणे असह्य होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक