शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे धाव

By admin | Updated: June 6, 2016 00:33 IST

तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा पुढाकार : ११ मे रोजी निघाला आदेश, पीक विम्याचा ‘क्लेम’ मिळाला नाहीतुमसर : तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली. परंतु शासकीय मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम बँकेत भरल्या. ती रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. याविरोधात १२ गावातील शेतकरी ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार आहेत.११ मे रोजी राज्य शासनाने तुमसर तालुक्यातील चिखला, गोबरवाही, राजापूर, पवनारखारी, गणेशपूर, सोदेपूर, खंदाड, गुढरी, सीतासावंगी, धामनेवाडा, येदरबुची व सुंदरटोला ही गावे दुष्काळग्रस्त घोषित केल्याचा आदेश काढला. परंतु नेमका फायदा कोणता हे अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना कळले नाही.शासकीय अधिकारी परिसरात फिरकले नाही. नेमके दुष्काळग्रस्त म्हणजे काय याबाबतर अनभिज्ञता येथे दिसत आहे. १२ गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढली होती. त्याची रक्कम बँकेत भरली.शासनाने ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली. या गावातील शेतकऱ्यांना बँकेने पीक विम्याचे क्लेम देण्याची गरज आहे. परंतु आतापर्यंत काहीच हलचल दिसत नाही. १२ गावातील लोकप्रतिनिधी व शेतकरी ग्राहक मंचाकडे खटला दाखल करणार आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता सोनवाने, संगीता मुंगसुमारे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले सह दिलीप सोनवाने, उमा सेनकपार, कविता बोमचेर, योगेश्वर देशमुख, कृष्णकांत बघेल, रेनू मासुलकर, वसंत बिटलाये, प्रभा उईके, शशीकला उईके, जमील शेख, इमला कठोते, वामन गाढवे, कल्पना टेकाम, इंद्रपाल शेंदरे या सरपंच व उपसरपंचांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)