शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बसेस चालतात चालकांच्या मर्जीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:56 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस या चालकांच्या मर्जीनेच चालत असून याचा नाहक तास विद्यार्थी व दररोज नोकरीनिमित्त येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस या चालकांच्या मर्जीनेच चालत असून याचा नाहक तास विद्यार्थी व दररोज नोकरीनिमित्त येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिल्हा परिषद चौकात प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना देखील सलग तीन तीन बसेस हात दाखवूनही थांबत नसल्याने चालकांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील धावणाºया शिवशाही बसेसबद्दलही प्रवाशांची व दुचाकीचालकांची ओरड कायम आहे. शिवशाही बसेसचे चालक हे कंत्राटी पद्धतीने कंपनीकडून भरलेले असल्याने यावर महामंडळाचा अंकुश नाही. तसेच भंडारा ते नागपूर काहीच थांबे असल्याने या बसेस अतिवेगाने धावत असतात. समोरून येणाºया दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. याबद्दल भंडारा आगार प्रमुखांना काही दुचाकी चालकांना भेटून झालेल्या घटनांबद्दल सांगितले असताना देखील याबाबत कोणतीही लेखी तक्रार चालकांना देण्यात आलेली नाही. अती वेगाने धावणाºया या चालकांवर महामंडळाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बसेसमध्ये जागा नसल्याचे कारण दाखवून अनेक बस हात दाखवूनही थांबत नाहीत.प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अनेकदा प्रयत्न केले जातात. परंतु जिल्ह्यात चालक वाहकांच्या प्रवाशांसोबतच्या तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कधी विद्यार्थी तर कधी आबालवृद्ध महिला यांच्याशी हुज्जतबाजीचे प्रकार वाढले आहेत. यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. अनेकदा सुट्या पैशांवरून प्रवाशांना अरेरावीने बोलणे तसेच बसस्थानकाच्या आधीच उतरविणे असे प्रकार घडले असताना देखील वाहकांवर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. त्याबद्दल प्रवाशांमध्ये महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र संताप दिसून येत आहे.नियमीत प्रवाशांसाठी हव्या नियमित बसेससंध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत भंडारा ते नागपूर धावणाºया बसेसची संख्या जास्त असली तरी अनेक लांब पल्ल्याच्या बस थांबविल्या जात नाही. त्यामुळे शहरात येणाºया विद्यार्थी तसेच नौकरदार वर्गाला नेहमीच घरी पोहचायला उशिर होतो. त्यामुळे आगार प्रमुखांनी या समस्येकडे लक्ष देऊन चालक वाहकांना सूचना देऊन दखल घेण्याची गरज आहे. तरच एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ होईल.