शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
4
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
5
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
6
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
8
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
11
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
12
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
13
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
14
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
15
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
16
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
17
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
18
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
19
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
20
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

विरलीत भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणी पुरवठा योजनेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.) : सध्या सुरू असलेल्या ईटान ते विरली (बु.) रस्ता बांधकामात येथील पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, गावकऱ्यांना भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणी पुरवठा योजना कार्यरत आहे. येथे १ लाख २५ हजार लीटर क्षमतेचे जलकुंभ असून, सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांद्वारे गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो.

सध्या सुरू असलेल्या विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामांतर्गत या रस्त्यावरील छोटेखानी पुलांचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे पूर्वी रस्त्याच्या कडेने असलेली पाइपलाइन आता रस्त्याच्या मधोमध आलेली आहे. या रस्त्यावर विरली (खुर्द) जवळच्या कालव्यावरील पुलाच्या बांधकामामुळे पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटली आहे. परिणामी, या पाइपलाइनला यू टर्न देऊन पाइपलाइनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे; मात्र यू टर्न देऊन केलेली जोडणी पाइपलाइनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाइपलाइन सटकत आहे. त्यामुळे या पाइपलाइनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून, स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या रस्त्यावर अशा प्रकारच्या एकूण सात पुलांचे बांधकाम प्रस्तावित असून, भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची गरज आहे.

पाइपलाइनच्या सदर समस्येमुळे येथील नळांना गत दोन दिवसांपासून पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. येथे ११ हातपंप आहेत; मात्र त्यापैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. तर काही नागरिक गावाशेजारच्या शेतातील मोटारपंपांवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. त्याचप्रमाणे येथील काही शेतकऱ्यांवर गुरांसाठी टँकरने पाणी आणण्याची पाळी आली आहे.

पाणी समस्येचे ग्रहण सुटणार कधी?

येथील पाणी समस्या ही विरलीकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. दर २० - २५ दिवसांनी येथील पाणी पुरवठा योजनेत कधी पाइपलाइन फुटणे, कधी मोटारपंप जळणे यांसारखे काही ना काही दोष येऊन गावकऱ्यांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील पाणी समस्येचे ग्रहण सुटणार कधी? असा गावकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.

कोट बॉक्स

विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामात पाणी पुरवठा योजनेची सुमारे ८० मीटर पाइपलाइन फुटली. पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लवकरच गावकऱ्यांना नळांद्वारे पाणी मिळेल.

-- लोकेश भेंडारकर

सरपंच, विरली (बु.)